माझ्या या ब्लॉग मधे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे .मी एक पक्का मराठी माणूस आहे त्यामुळे साहजिकच मराठी माणसाबद्दल माझ्या मनात असीम आत्मीयता आहे.मला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे .आणि आतापर्यंत काही मोठे ट्रैक सुदधा केले आहेत. सह्याद्री आणि मी घनिष्ठ मित्र आहोत असे मला वाटते.माझे आदर्श,माझे दैवत छत्रपती शिवराय यांचे कार्य पुढील पिढीसमोर ठेवणे हे माझे प्रथम काम आहे .या ब्लॉगमधे सह्याद्री,गडकिल्ले कोकण,माझे ट्रेकिंगचे अनुभव,मराठी माणूस यांवर प्रामुख्याने बोलणार आहे.
सोमवार, १४ डिसेंबर, २०१५
किल्ले वसई दुर्गदर्शन 7/12/15 वसई रोड स्टेशन _पश्चिम रेल्वे
मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५
शुभ दिपावली
शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५
रक्षाबंधन -पवित्र सण
बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५
भटकंती 3
भटकंती 2
भटकंती 1
रविवार, २ ऑगस्ट, २०१५
भीमाशंकर _शिडीघाट,गणेशघाट
सोमवार, २० जुलै, २०१५
रविवार, १४ जून, २०१५
माणुस मी .....
माणूस म्हणून जन्मलेला माणूस
माणसासाठी जगत असतो
आपल्या सिमित आयुष्याला
नवे अर्थ लावत असतो
मनातल्या लहरींवर स्वार होऊन
माणसांच्या समुद्रात पोहत असतो
एखाद्या मोठ्या लाटे खाली
चिंब चिंब भिजत असतो
किनार्यावर असतांना तो
त्याच लाटेची वाट पहातो
इतर लहान लहरी आल्या
तरी तिथेच बसून टिपं गाळतो
रागावलेल्या माणसालाही
सागराकडेच जावं लागतं
दुसर्या माणसांच्या लहरींनाही
आपल्या कवेत घ्यावं लागतं
माणसाचा हात धरून
चालणारा माणूस मी
हरवलेल्या लाटेला
शिधणारा माणूस मी
खडकावर आदळूनही
खिदळणारा माणूस मी
बर्फासारखा थंड तरी
पिघळणारा माणूस मी
क्षितिजावरील आकांशांकडे
पोहणारा माणूस मी
रोज मावळत्या सूर्यासंगे
उगवणारा माणूस मी
साभार:मराठीमाती वेब पोट्रल
शुक्रवार, १२ जून, २०१५
गणपतीपुळे _गणेश मंदिर
रत्नागिरी जिल्ह्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे. गणपतीपुळे, पावस, आडिवरे, मार्लेश्वर, कसबा, अशी अनेक तीर्थक्षेत्रे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. सा-या बाजूंनी रत्नागिरी जिल्हा समृद्ध आहे. अगदी तिथल्या माणसांपासून ते निसर्गापर्यंत सारं काही आपलंसं करणारे आहे. कोकणातली माणसं तर त्यांच्या अगत्यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोकणदेखील आपल्याला कायमच खुणावत असतं.
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. स्वयंभू गणेशाचे हे स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्यअसे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे. किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल. मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेच आपण किना-यावरच उतरतो. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू तर दुस-या बाजूला खडकाळ प्रदेश असे हे अनोखे आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणा-या दुर्वा मात्र तिथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.
येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनमोहक आहे.
राहण्यासाठी खोल्या :
गणपतीपुळे यथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.
कसे जावे :
मुंबई गोवा महामार्गावर निवली पासून एक रस्ता आहे .रत्नागिरी शहरापासून नेवरे -कोतवडे मार्गे गणपतीपुळे जाण्यासाठी देखील सहज शक्य आहे .गणपतीपुळे देखील मालगुंड पासून जयगड रोड , वरवडे बाजूला जोडलेले आहे .
विमान:
जवळचे विमानतळ बेळगाव , 299 किमी आहे.
रेल्वे :
तसेच रेल्वेने देखील पर्यटक रत्नागिरीला उतरून गणपतीपुळ्याला जाऊ शकतात.
बस:
गणपतीपुळे रत्नागिरीपासून सुमारे ४० कि. मी. लांब आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे थेट बससेवा पुरवते.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
गणपतीपुळे समुद्रकिनारा , मालगुंड , पावस , मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा , डेरवण , परशुराम मंदिर , जयगड किल्ला
साभार:गूगल ब्लॉग.
संकलन:किरण भालेकर
शनिवार, ३० मे, २०१५
कुठेतरी छानसे वाचलेले....
" सर, ताक घ्या ना. फक्त १० रुपये "
फाटक्या कपड्यातील एक चिमुरडी माझ्या समोर ताकाचा ग्लास धरून उभी होती. तिच्याही तोंडी "सर" शब्द आला हे ऐकून वाईट वाटलं. कारण ठिकाण होतं रायगड किल्ला. ३५० पेक्षा जास्त वर्ष उनपावसाचा मारा सहन करूनही टिकून राहिलेल्या दगडी पायर्यांवर ही मुलगी हातात ताकाची एक किटली, चार ग्लास आणि ग्लास धुवायला बादली घेवून बसली होती. मी ताक घेतलं आणि पिताना तिच्याकडे पाहू लागलो. हाडाची काड झालेली. अजून दुधाचे दात पडले नव्हते आणि पोटाच खळग भरण्यासाठी काबाडकष्ट करू लागली होती. शिवाजी महाराज गेले आणि अश्या असंख्य कष्टकर्यांची रयाच गेली. रायगड भग्न होत गेला आणि ह्यांचं जीवन त्यापेक्षा जास्त भयाण झालं. त्यानंतर अनेक सत्ता आल्या-गेल्या. पण रायगडावर राहणाऱ्या ह्या कष्टाळू लोकांचे कपडे जास्त फाटत गेले.
एकेकाळी ह्या रायगडावर आरोळी उठत असे,
" चल मर्दा, उपस तलवार. शत्रू कोकणात उतरतोय. आमची शेती जळेल अन आया-बहिणीची अब्रूबी शिल्लक रहायची नाही."
मग सपासप तलवारी तळपू लागायच्या.
" जय जिजाउ , जय शिवराय ...हर हर महादेव ....यळकोट यळकोट जय मल्हार"
सगळे रांगडे गडी शत्रूवर तुटून पडायचे.
कांदा भाकर खाणारे मुठभर मावळे दहा हजार फौजेवर काही कळायच्या आधीच हल्ला करायचे. शत्रू तोफेत गोळे भरायला निघायाचा, तोवर मावळ्यांनी अनेकांच्या खांडोळ्या केलेल्या असायच्या. शत्रूच नाही तर महापराक्रम गाजवलेली ती क्रूर तोफसुध्धा शरण यायची. मावळे एका हातात तलवार, आणि एका हातात मृत्यू घेवून फिरत...फक्त महाराजांसाठी!!
"सर, अजून एक ताक घ्या ना, फक्त दहा रुपये" मी भानावर आलो. इतिहास इतिहासजमा झाला आणि वर्तमानात उरली दिवसभर रायगडावर ताक विकत फिरणारी ही कन्या. एक ग्लास ताक पिवून झालं होतं. तरीही अस वाटलं आणखी एक ग्लास पिवूया. कारण त्याबदल्यात तिला जे पैसे द्यावे लागतील, तो फक्त तिचा" profit " नसेल तर कष्टाला दिलेली सलामीही ठरेल.
हल्ली ह्या कष्टाला कोण सलामी देतं? सिनेस्टार्स, क्रिकेट खेळाडू, गायक आणि राजकारणी ह्यांना पद्म पुरस्कार मिळतात आणि दिवसभर उन्हात उभं राहून ताक विकणाऱ्या मुलीला मिळतात एका ग्लासामागे दहा रुपये.
मी तिला विचारलं, "शाळेत जाते का ?"
तिने उत्तर दिलं, "जातो की..आम्ही गडावरची सारी मुलं खाली पाचाडमध्ये शाळेत जातो."
मी थक्क झालो. अंदाजे १५०० पायर्या उतरून- पुन्हा चढून ही मुले शाळेतही जात होती. रायगडाची उंची आहे 1,३५६ मीटर. पण ह्या इवल्याश्या पोरांची कर्तबगारी आहे आसमंताला भिडणारी. ती मोजायची तर मीटरमध्ये मोजता येत नाही. मीटर त्या शाळेत जाणार्या मुलांना मोजावे लागतात, जे school bus मधून शाळेत जातात-येतात... घरपोच!!
इथे रायगडावरील आणि इतर गडांवरील मुले उरलेल्या वेळेत ताक, लिंबू सरबत विकून चार पैसे कमावतात. महाराजांनी चारी बाजूने आक्रमण होतं असूनही स्वराज्य आणलं ते अश्याच गड्यांच्या बळावर...हे जग चालतं ते अश्याच कष्टकर्यांच्या जोरावर ..
--असाच एक वाचनात आलेला सुंदरसा लेख ..
शुक्रवार, २९ मे, २०१५
लेखणी बरसु लागते तेव्हा.....
बरेच दिवस झाले लेखणी शांतपणे एका कोपर्यात पहुडली होती.कदाचित तिची मला आठवण झाली नसावी.ही लेखणीच माझी खऱ्या अर्थाने सोबतीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.कुठेतरी व्यक्त होण्याची मी संधी पाहत असतो आणि ती मला यामधुन मिळते.प्रसंग लिखाण आणि टिकात्मक लिखाण यावरच माझा जास्त भर असतो.
आज अचानक काही गोष्टी नजरेसमोर आल्या म्हणजे तश्या जुन्याच आहेत पण मला मात्र नवख्याच वाटु लागल्या.डोळ्यातली विझत आलेली आग पुन्हा धगधगुन पेटायला लागली.लिखाणातून परत एकदा बरसु लागली.
महाभारतात अर्जुनाला सुद्धा स्वकीयांविरुद्ध शस्त्र उचलणे भाग पडले.इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाऊ व्यंकोजी राजे यांच्याविरुद्ध शस्त्र उगारावे लागले होते.आणि महाराजांचा हाच आदर्श प्रमाण मानून आपल्याच स्वजनांविरुद्ध लेखणी चालविताना आमचे हात डगमगणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ.
महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ म्हणजे महा+राष्ट्र=महाराष्ट्र होय.महा म्हणजेच मराठा आणि या मराठयांचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय.तर अशा या महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, शिवकालीन मराठी घराणी आजही वास्तव्यास आहेत.यातीलच काही मराठा घराण्यानी वतनाच्या ,सत्तेच्या लोभापायी वर्षानुवर्ष सुलतानांची चाकरी करण्यातच धन्यता मानली.सुलतानांच्या दरबारातले मातब्बर सरदार म्हणून हेच मराठे नावारूपास आले.त्यांची आता नावे घेत नाही सुजाण वाचकांस ते ठावुक असेल यात तिळमात्र शंका नाही.
यातीलच काहीजण आजही सुलतानांनी दिलेली वतने ,किताब लाखमोलाने मिरवत आहेत.जनतेची दिशाभूल करत आहेत .त्यांना उसने अवसान आणून सांगत आहेत कि आम्ही इतिहासात अशी कामगिरी केली.आपल्या नावापुढे खुशाल राजे लावण्यात यांना अभिमान वाटतो.आम्ही या प्रांताचे राजे,त्या प्रांताचे खोत,कोकणचे राजे ......
काहीजण तर सुलतानराव असे किताब मिरवत आहेत.या लोकांना लाज तरी कशी वाटत नाही?ज्यांच्या नावातच अर्थ दडलेला आहे तोसुद्धा या मुर्खाना कळत नाही.सुलतान सम्राटांनी दिलेले किताब कोणते आणि महाराजांनी केलेले गौरव कोणते?हे कळन्याइतपत आम्ही मुर्ख नाही.त्यामुळे अशा लोकांनी आमच्यापासून दोन हात लांब राहणेच त्यांच्यासाठी सोईस्कर जाईल.
याच मराठ्यानी शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेसाठी मदत केली असती तर आजचा इतिहास काहीतरी वेगळा असू शकला असता.फितुरी ,गृहकलह याचा मराठयांना पिढ्यानपिढ्या शाप आहे.इंग्रजांनी याचाच फायदा घेतला .तोडा,फोडा आणि राज्य करा या नितिचा वापर करुन देशाची विभागणी करुन ते निघुन गेले आणि जाता जाता भांडण लावून गेले.आजही त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. आताही आमच्यामध्ये एकी निर्माण झालेली नाही.एकमेंका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ.या वचनाचा आम्हाला विसर पडला आहे.आपलेच भाऊबंद वरच्या पायरीवर जात असतील तर आपण त्यांना तळाची पायरी दाखवून आसुरी आनंद साजरा करत आहोत.इतिहासात पण आपण हेच करत आलो आहोत आणि आताही परिस्तिथी काही वेगळी नाही .
काय करू शब्द खुप आहेत पण लिहिन्याची इच्छा नाही.
Bhalekar117.blogspot.com
किरण भालेकर
बुधवार, २७ मे, २०१५
ट्रेकर्सची लक्षणे
१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच
काहीना काही कीडे केलेले असतात .
त्यातहीकिंवा सैफच्या टशन स्टाइल
मिश्या यांच्या फार आवडत्या . काही ट्रेकर्स
असेहीअसतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत
त्यांना मुली असे म्हणतात
२.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले
किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही
३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
* सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात
चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्याभाषेत
पिट्टूम्हणतात . त्याला एखादा snap
किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर
अडकवलेली असते.
* शुक्रवार रात्र: निघायची तयारी …ख़राब
फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट ,
Bombay Natural History Society चे
कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले
टी शर्ट , कमरेला वेस्टपाउच (ही एकखासचीज
आहे …हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात
अनुभवी बनचुका ट्रेकरअसल्यास स्लीपर / मध्यम
अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच
नवखा असल्यास भारी बूट
* शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर
उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट
…काही ट्रेकर्सउघडे नसतात त्यांना मुली असे
म्हणतात
४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
* सोमवार ते शुक्रवार सकाळ:
आपापला धंदा नोकरी व्यवसाय …नाईलाजाने.
* शुक्रवार रात्र: CST
स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली … ही trek
साठी भेटण्याची जागा.
* शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा,
कसारा, इ. इ. S T stand
* शनिवार दुपार ते रविवार दुपार:
कुठल्यातरी गडावरील केव्ह
५.अन्य विशेष लकबी:
* हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर
असतात , पण ९० % वेळा दुसर्या club
बरोबरट्रेकला जातात
* ट्रेकला वा शहरात
कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत
नाहीत …. साधी गोळी जरी खाल्लीतरी कागद
व्यवस्थीत खिश्यात ठेवतात .
कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो .
पणकिल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी +
वायु प्रदुषण जरुर करतात
त्यातही त्यांची फारशी चूकनसते .
रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे,
दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते
* बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा,
अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना,
पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी
* यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते ,
एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ
सैकमध्येप्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे,
कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी,
तिच्यात छोटीडबी , तिच्यात
कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी
यांचा wastepouch ही एक धमाल चीजअसते : यात
caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत
जगातील काहीही अफलातून गोष्ट
असतेएका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६
A बघीतला होता आता बोला सैक
सुद्धा अशी सुरेखभरतील की पाहत रहावं .
६.खाण्या पिण्याच्या सवयी:
* कशालाही नाही म्हणणार नाहीत हवे ते
हक्काने मागून घेणार
* काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून
घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून
खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी
* पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील
पाणी ओतायची यांची खास पद्धत असते .
बाटलीचेझाकण उघडून बाटलीच्या तोंडावर
डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे
आणिथोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार
कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही
७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:
* खणखणित आवाजात पोवाडे गाणे
* जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे
* बैटिंग ला जाणे
८.यांची दैवते:
* offcourse शिवाजी महाराज
* रायगडचा जगदीश्वर
* हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन
गडचा अमृतेश्वर इ . इ .
९.यांची तिर्थस्थळे:
* राजमाचीचा तलाव
* बाण चा ब्लू लगून
* नाणे घाटातील केव्ह
* कोंकण कडा इ . इ .
आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं
एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते
त्याचप्रमाणेप्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू
इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक
कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न
असते
१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज
* यांना मुली आवडत नाहीत
काही म्हणी आणि वाक्प्रचार :
* खाईन तर तुपाशी नाहीतर……… adjust करेन
* वाट पाहीन पण एस टी नेच जाईन
* केव मध्ये “आला वारा गेला वारा” तो कुणाचा सोयरा
* An alive ordinary rock climber is always better
than an excellent dead rock climber !!!
महाजालवरुन साभार .
राजा शिवछत्रपती...
मंगळवार, २१ एप्रिल, २०१५
राजा शिवछत्रपती..
प्रोढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास”
ब्राम्हण सत्ताधारी, वॆश्य व्यापारी आणि यांची सेवा करण्यासाठी क्षुद्र असा संकोचित विचार रुजवीला गेला व देश हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधार कोठडीत नेऊन टाकला. अशा वेळी महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण भारत गुलामगिरीच्या कोठडीतुन बाहेर काढणारा राजा शिवाजी हा क्षत्रिय कुलावंतास म्हणजे क्षत्रियांची पराक्रमाची गाथा सुरू करणारा ’युग पुरुष’ होय. म्हणुनच शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी, “प्रॊढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास” अशी घोषणा केली. महारष्ट्रातील धर्मपंडीतांनी पुन्हा हे घोष वाक्य बदलुन गेली अनेक दशके “गोब्राम्हण प्रतिपालक राजाधिराज शिवाजी महाराज” असे सांगुन पुन्हा हे राष्ट्र गुलाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
इंद्रजालवरुन साभार...
शुक्रवार, १० एप्रिल, २०१५
गोळवशी -माझं गाव
लांजा तालुक्यात साटवली रोडला वसलेले माझ गोळवशी गांव .माझ्या या जन्मभूमिबद्दल थोडस काय आहे ना आज गावची आठवण येत आहे आणि मनाच्या कोपर्यात साठवून ठेवलेल्या आठवणींचा कप्पा अलगद उफाळून वरती येऊ पहात आहे आणि त्याला बंद करणे माझ्याच्याने तरी शकय नाही .या आठवणींची पण वेगळीच गम्मत आहे.काही आठवणी रडता रडता हसवायला लावणाऱ्या तर काही हसता हसता डोळ्यात अश्रु आणणारया,काही अबोल तर काही अविस्मरणीय .गावच्या आठवणीबद्दल माज हेच मत आहे या आठवणी कधींही न विसरता येणाऱ्या -अनमोल याबद्दल प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात.परंतु आमच्यासारख्या गांव सोडून कामधंद्यानिमीत्त मुंबईत स्थायिक ज़ालेल्या लोकांच्या गावच्या आठवणी काहिशा भावुक असतात.
गोळवशी गांव महाराष्ट्राला नविन नाही.गावची ग्रामदेवता आई नागादेवीची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे.महाराष्ट्राच्या कनाकोपर्यातून भक्तगण आई नागादेवीच्या दर्शनाला येत असतात.आमच्या गावचा बायंगी देव खुप प्रसिद्ध आहे.त्यामुळे कोणी मस्करीमध्ये विचारल की तू कुठला रे ?त्यावर मी म्हणतो लांज्याचा.मग समोरचा परत बोलतो लांज्यात कुठे ?त्यावर मी म्हणतो गोळवशी.
पुढचा माणूस अतिशय अदबीने बोलायला लागतो.ज्यांना आमच्या गावची महती माहित आहे ते आमच्या वाट्याला जात नाहीत.याचे कैक अनुभव आहेत.माझे आजोबा असे सांगायचे कि पूर्वी आमच्या गावातील आंबा,काजु जमिनीवर जरी पडलेले असले तरी ते उचलण्याची हिंमत आजुबाजूच्या गावातील लोक करत नसत.इतके सगळे वचकुन असत.आणि आजही 2015 साली परिस्तिथी काही वेगळी नाही.
तुम्हाला म्हणून सांगतो मित्रहो आम्ही क्रिकेट स्पर्धांसाठी पंचक्रोशी,तालुक्यामध्ये खेळायला जातो.आमच्या संघाच नाव आहे नागादेवी गोळवशी.समोरच्या टिमच्या तुलनेत आमच्याकडे सगळे लींबु-टिंबूचा भरणा असतो.समोरची टीम अगदी जिंकायला आलेली असते .अचानक सामन्याचा रंग पालटतो प्रतिस्पर्धी टिमच्या हातातोंडाशी असलेला घास आम्ही हिरावुन घेतो.समोरचे बिच्चारे अक्षरशः
रडत मैदान सोडतात .जाता जाता म्हणतात कि बायंगी उठवलानी वाटत .हसून हसून पोट दुखायची वेळ येते.म्हणतात ना ते नावात काय आहे?नावात बरंच काही आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला हा गांव.राजापुरला जाताना शिवाजी महाराज गावातुन नदीपार करुन गेले.आणि इंग्रजांची वखार लुटली.गावाच्या सिमेवरून मुचकुंदी नदी वाहते.विशाळगडाच्या पायथ्याला नदिचा उगम होतो.नदिला बारमाही पाणी असते.नदी पुढे पूर्णगडच्या खाडीला मिळते.
मंगळवार, १० मार्च, २०१५
शिवजयंती आणि सत्यनारायण पूजा .....
दि:8 मार्च 2015 तिथिनुसार शिवजयंती महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेना आणि शिवजयंती हे अविभाज्य समीकरण आहे.लोकमान्य टिळकांनी चालू केलेली शिवजयंती आणि गणेशउत्सव बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे जपले आणि मराठी माणूससुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.मराठी माणूस जेथे जेथे गेला तिथे त्याने हे उत्सव साजरे केले.आणि आपल्या परंपरा चालिरिती यांची जपणूक केली.म्हणूनच आजही परदेशामध्ये आजही हे उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. हे बघितल्यावर आमची छाती गर्वाने आणि अभिमानाने भरून येते.असो .
आज जरा एका वेगळ्याच विषयवार घसरतोय .समाजामध्ये वाढत चाललेली ब्राम्हणी पद्धत आणि पूजेअर्चेच माजलेल स्तोम यांना फटकारण खुप गरजेचे आहे .यासाठीच हा अट्टाहास.
काल आमच्या विभागात सुद्धा शिवसेना आणि मनसेतर्फे शिवजयंती मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरी केली गेली.याबद्दल प्रथम सर्वांच अभिनदंन करतो.आणि काय आपल्या विषयाला सुरुवात करुया.
शिवजयंती आणि सत्यनारायण पूजा यांचा काडीमात्र संबंध आहे का ?महाराजानी स्वराज्यनिर्मितीसाठी सत्यनारायणाची पूजा केली होती काय ?हे माझ्या तर ऐकिवात नाही किंवा आजपर्यन्तच्या वाचनात नाही.कदाचित आपण विसरला असाल कि शिवरायांनी स्वराज्यस्थापनेची शपथ घेताना आपल्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वरवार केला होता.मग काय हा दुर्दैवविलास ?त्यांच्याच जयंतीला आपण समोर त्यांचा फोटो ठेवून सत्यनारायणाची पूजा करत बसलो आहोत .हे बघुन त्यांना काय यातना झाल्या असतील याचा आपण कधी विचार केलाय ?रस्त्यावर शिवजयंतीचे काल मोठे मोठे फलक झळकत होते.पण राजे त्यात तुम्ही नजरेस येत न्हवता.पुढाऱ्यानी आपल मार्जिन कमी होतं म्हणून तुमचा फ़ोटोला एका कोपर्यात मोजूनमापुन बसवला होता.आणि त्याच्याखाली लिहिल होत प्रमुख कार्यक्रम :सत्यनारायणाची महापूजा.भाविकानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
राजे काल शिवजयंतीला उपस्थित राहून तुम्हाला अभिवादन करणारा तुमचा कट्टर मावळा मला कुठेच दिसत नहवता तो कुठेतरी हरवला होता.दिसत होता तो फ़क्त डीजेच्या तालावर नाचनारा आजचा तरुण आणि भगवा सदरा घालून गर्दीत मिरवणारा आजचा नेता राजे मला वाटल होत आजतरी मराठी माणूस एकत्र येईल पण त्याला तुमच्यासाठी वेळच भेटला नाही .राजे तुमच्या नावावर आजपर्यंत कितीतरी जण मोठे झाले आणि अजूनही होत राहतील याची आम्हाला खात्री आहे.
राजे आज संभाजी राजांची महाराष्ट्राला खरी गरज आहे .ब्राम्हण लोकांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी समाजामध्ये देवाच्या नावावर धंदा सुरु केला आहे.सत्यनारायण पूजेचा नविन धंदा त्यांनी निर्माण केला आहे.समाजातील निरक्षरता ,अंधश्रद्धा यांचा त्यांनी आपल्या स्वार्थसाठी उपयोग करुन घेतला आहे आणि आपल दुर्दैव म्हणजे साक्षर लोक सुद्धा या प्रकाराला बळी पडत आहेत.
आजकाल राजे सत्यनारायणाची पूजा त्या फैशन-शो सारखी झाली आहे .गणपती बाप्पा आले कार्यक्रम काय तर सत्यनारायण पूजा आहे .टिळकांनी गणेश उत्सव का स्थापन केला? याचाच आम्हाला विसर पडलाय.त्यात कोणी दिडशहाणा भेटला आणि त्याला विचारल की का रे बाबा सत्यनारायण पूजा तुम्ही का करता ?उत्तर अनपेक्षित अस नातेवाईक एकत्र येतात.मुलाच लग्न ठराव म्हणून ,घरात सुखशांती नांदावी म्हणून,शेजारयांनी केली म्हणून अशी अनेक उत्तरे ऐकून मीच खजील झालो.हल्ली तर लग्न झाल की हमखास सत्यनारायण पूजा असनारच.महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या कुठल्याही लग्नाची पत्रिका उघडून पहा.पूजेचा रकाना असल्याशिवाय राहणार नाही.अहो लग्न ठरवायच्या अगोदर पूजा कधी घालायची यावरून वधु-वर पक्षात वाद सुरु असतात .ही आजची वस्तुस्तिथी आहे. नवरात्र उत्सव आला कार्यक्रम काय? सत्यनारायण महापूजा एकीकडे आपण दुर्गादेवीची पूजा करतोय आणि दुसरीकडे सत्यनारायण महाराज .पाया पडायला येणारी लोक कोणत्या देवाच्या पाया पडू या संभ्रमात असतात.आणि मग ते सत्यनारायणाच्या पाया पडतात आणि मोकळे होतात.
किरण भालेकर
बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५
रतनगड ट्रैक स्टोरी भाग 2 -टाइगर ट्रैकर्स
प्रत्येकाचे चेहरे बघन्यासारखे झाले होते.त्यांच्यात स्फूर्ती आणण्याची गरज होती.
आमच्याजवळील माइक सिस्टीम बाहेर काढली आणि शिवछत्रपतींच्या आणि आई भवानीच्या जयघोषाने अवघे जंगल दुमदुमुन गेले.फक्त 6 जणांचा आवाज पण ऐकणाऱ्याला वाटाव कि 50000 हजाराची फौज गडावर चाल करुन येत आहे.मित्रांमध्ये स्फूर्ती आली आणि पुन्हा नव्या दम्याने आणि जोशाने रतनगड जवळ करू लागलो.बरोबर तीन तासाने आमच पहिल टार्गेट पहिली शिडी गाठली.रतनगडच्या या शिड्या उभ्या कड्याला भिडलेल्या आहेत.आणि काळाने खुप गंजलेल्या अवस्थेत आहेत.नजर वर करुन पहिल तरी दरदरून घाम सुटावा.एकावेळी एकच माणूस शिडीवरुन जाऊ शकतो.या शिडीवरुन तोल गेलाच तर मृत्युला खुल आमंत्रण दिल्यासारखे आहे.शिवछत्रपतींचा जयघोष आसमंतात दुमदुमत होता.या शिड्या अंदाजे 4000 किंवा त्यापेक्षा अधिक उंचीवर आहेत.वरुन खाली बघितल आणि आम्हाला कल्पना आली कि आम्ही किती मोठ शिखर सर केले आहे.अशा 6 आडव्या -उभ्या शिड्या पार केल्यावर दरवाजा लागतो.दरवाजा आजही उत्तम स्तिथीमध्ये आहे.दरवाज्यावरील शिल्पकामही अप्रतिम आहे.दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हाताला एक प्रचंड कडा लागतो. जायला एक निमुळती वाट आहे आता शासनाने तेथे तटबंदी उभारली आहे.ईथे दोन गुहा आहेत 1) रत्नादेवीची गुहा 2)अंधारी गुहा
रत्नादेवीच्या गुहेमध्ये 6 जणांचा ग्रुप आरामात राहु शकतो.तर मोठ्या गुहेमध्ये 20 ते 25 जण आरामात राहु शकतात.रत्नादेवीची गुहा ही आतून अतिशय उबदार ,स्वच्छ प्रकाशाची आणि सुरक्षित आहे.सकाळी लवकर गेल्यामुळे आम्हाला रत्नादेवीची गुहा रहायला मिळाली.गुहेमध्ये रत्नादेवीची अतिशय प्राचीन मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची सुद्धा प्राचीन मूर्ती आहे.रत्नादेवीची आम्ही सर्वानी विधिवत पूजा केली.आता आपल्याला कळले असेल की रत्नादेवीच्या नावावरूनच गडाला रतनगड असे नाव पडले.
गडावर पोहोचल्यावर आम्ही एनर्जीसाठी लिंबु सरबताचा बेत आखला होता पण रतनवाडीला लिंबु मिळालच नाही साखर तेवढी बरोबर होती.साखरेचे गोड पाणी आम्ही प्यायलो.पण ते गोड पाणी प्रचंड थंडगार आणि मधुर लागत होत.गडावर थंडगार पाण्याची दोन तळी आहेत आणि त्यामध्ये मुबलक पाणी बारमाही असते.त्याबरोबरच भेळ बनवली होती.थोडस पोटात गेल्यामुळे बर वाटत होते.विश्रांती केल्यानंतर आम्ही गड फिरण्यासाठी बाहेर पडलो.फोटोग्राफी साठी जनुकाही रतनगडावरील आकाशाला गवसणी घालणारी उंचच उंच शिखरे आम्हाला साद घालत होती.रत्नादेवीच्या गुहेच्या समोर डाव्या हाताला आकाशाला भिडलेला एक प्रचंड सुळका दिसतो तेथील गावकरी यांच्या मते त्या सुळक्यावर शिवपिंडी आहे व तिथून सतत पाण्याची धार चालु असते.कावेरी नदीच उगमस्थान तेथे आहे याबद्दल गावकर्यांच्या मनात संभ्रम आहे. रतनगडावरील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे.आयुष्यात इतकी शांतता प्रथमच अनुभवत होतो.मन अगदी निरभ्र होऊन गेले होते.तेव्हाच मनाशी ठरवले की आयुष्यात पुन्हा कधीतरी नक्कीच या ठिकाणी येईन.
मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५
रतनगड ट्रैक स्टोरी -टाइगर ट्रैकर्स
22 nov 2013
हा दिवस माझ्या आयुष्यातला एक यादगार दिवस म्हणता येईल .रतनगड ट्रैकच्या निमित्ताने एक अतिशय दुर्गम असा ट्रैक आम्ही पार पाडला .टाइगर ट्रेकर्सचे ग्रुप लीडर वैभव भालेकर आणि इतर सभासद त्यामध्ये संतोष भाताडे,सचिन भातरे ,नितेश पांचाळ ,चेतन टेंकाळे आणि मी. अवघे 6 जण .परंतु दुर्दैम्य इच्छाशक्ती ,धाडस 'आणि चिकाटी या जोरावरती हा ट्रैक पार करणाऱ्या या माझ्या मित्रांना सलाम करतो. आणि या ट्रेकच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करण्याचा हा छोटासा प्रयत्न ........
अंधेरीमध्ये (सीप्ज) साई संघवी स्टार प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे.आता ती बंद आहे पण आजही साईबाबांच मंदिर तेथे आहे.या कंपनीमध्ये आम्ही त्यावेळी कामावर होतो.ग्रुपमधील सर्वजण कोकणाकडचे असल्याने आमची एकमेकांशी छान मैत्री झाली होती.आणि अशातच आमचं पिकनिकनला जायचे ठरले.रतनगडला भाऊ वैभव जावून आलेला असल्यामुळे त्याला तिकडची सर्व माहिती होती.तोही आमच्याबरोबर कामाला होता.त्यामुळे बेसिक प्लानपासून अगदी फाइनल प्लॅनिंग सर्व त्याने केल होत.म्हणजेच गाडीच वेळापत्रक ,मॅप,कालावधी वैगरे सर्वकाही.....
अगदी मिनिटांचा हिशोब काढला होता.अर्थात त्याला बेस्ट प्लानरचा किताब दिला पाहिजे असा मानुस.
22 nov 2013 तारीखला शुक्रवारी संध्याकाळी आम्ही सर्वजण c.s.t स्टेशनला एकत्र जमलो.कारण आम्हाला रात्रीची महानगरी एक्सप्रेस पकडायची होती.या एक्सप्रेसला दोनच जनरल डबे असतात.आम्हाला मस्तपैकी बसायला जागा मिळाली आणि अशारीतिने आमच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.इगतपुरी स्टेशनला आम्हाला उतरायच होत.ईगतपुरीहुन आम्हाला शेंडी गावाला जाणारी बस पकडायची होती.इगतपुरी बसस्टैंडलाच आम्ही रात्र काढली आणि सकाळी 6.30 पहिली बस पकडून शेंडीला निघालो.अफाट थंडी पडली होती.बसचा मार्ग अतिशय खडतर होता आणि रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते.बरोबर 7 वाजता आम्ही शेंडी गावच्या फाटयावर उतरलो.कारण तिथून आम्हाला रतनवाडी गडाचा पायथा जवळ करायचा होता.रतनवाडीतून रतनगडला जायचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे भंडारदरा डॅम 9 किमी होडिने किंवा रस्त्याने ट्रॅव्हल्स गाडीद्वारे
शेंडी गावात उतरल्यावर पाच मिनिटे सरळ पुढे चालत गेल्यावर भंडारदरा डॅम हे इंग्रजकालीन मोठे धरण आहे.या भागाला पिकनिक पॉइंट असे म्हणतात .ईथे आम्ही फोटोग्राफीची हौस भागवुन घेतली.बोट फेरींची सोय नसल्यामुळे आम्ही ट्रॅव्हल्स गाडी बुक केली.दोन वेळेच्या येन्याजाण्यासाठी गाडी असणार होती.आणि अशारीतिने ट्रॅव्हल्स गाडीद्वारे आम्ही निघालो अतिशय खाचखळग्याचा रस्ता आहे.प्रवासामध्ये रंगत भरण्यासाठी आम्ही आमच्या बरोबर आणलेली ढोलकी काढली आणि आमच्या भजनाला सुरुवात झाली.माझा भाऊ वैभव हा उत्कृष्ट ढोलकीपटु असल्यामुळे कार्यक्रममध्ये अतिशय रंगत आली. 1.30 तासाच्या प्रवासानंतर आम्ही रतनवाडीला पोचलो.इथेच अमृतेश्वर देवस्थान आहे.अतिशय पुरातन असे मंदिर आहे अंदाजे 700-800 वर्ष पुरातन असावे.आम्ही मंदिरात पोचलो त्यावेळी मंदिराच्या गाभार्यामध्ये पाणी होते.शिवपिंडी पूर्ण पाण्यात होती. दरवाज्यासमोरचा काळ्या पाषाणातील नंदी आपल स्वागत करतो.अमृतेश्वर मंदिराजवळील प्राचीन तळे अतिशय मनोहर आहे.अमृतेश्वर देवाची पूजा करुन आम्ही मोहिमेला सुरुवात केली.
आमचे सुदैव असे कि गावातील काही मंडळी गडावर पर्यटकांची व्यवस्था करण्यासाठी चालली होती त्यामुळे आम्हाला वाटाड्याची गरजच उरली नाही.सरळ रस्ता संपून जंगल चालू झाले होते.सह्याद्रीचच जंगल ते निबिड घनदाट .हिंस्त्र श्वापदांची तेथे काहीच कमी न्हवती.जंगलामध्ये खुप फसव्या वाटा आहेत त्यामुळे पुरेशी माहिती असल्यशिवाय जाने धोक्याचे आहे.पर्याच्या काठाकाठाने वाट जाते.आणि येथील निसर्गसौंदर्य तर अवर्णनीय सोबतच्या मंडळीला गडावर जाण्यासाठी घाई असल्यामुळे त्यांच्याकडून वाटेची पुरेशी माहिती घेतली.चालता चालता सूर्य डोक्यावर कधी आला ते कळलेच नाही .उभ्या चढनीमुळे सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा वाहु लागल्या होत्या.वाटेच्या जवळच मोठा पर्या वाहत होता आणि आमची अंघोळही झाली न्हवती.मग काय एक छानशी जागा अंघोळीसाठी निवडली. पाण्यात पाय घातला आणि काय अंगावर काटा आला .बर्फापेक्षा थंडगार पाणी आणि तेही भरदुपारी 12 वाजता आयुष्यात पहिल्यांदा पाहत असेन.पाण्यामध्ये यथेच्छ अंघोळीवर ताव मारला .आणि आम्ही मार्गक्रमित झालो.सह्याद्रीची सफर फक्त तिघेच करू शकतात .1)वारा2)वाघ3)मराठे....
या वाक्याची जर प्रचिती घ्यावयाची असेल ना तर ईथे यावे.रतनगडचे प्रस्तररोहण उभ्या चढनीचे आहे.दर एक तासाने विश्रांती घ्यावी लागत होती.बरोबर आणलेल्या काकडी ,गाजर यांचा एव्हाना फन्ना पडला होता.अगदी पेपरमिटची एक गोळीसुद्धा वाचली नाही.एक डोंगर संपला की आता गड येईल अशी आशा वाटत होती पण गड काही नजरेत येत न्हवता.माझे सर्व मित्र काकुळतिला आले होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
लांजा तालुक्यात साटवली रोडला वसलेले माझ गोळवशी गांव .माझ्या या जन्मभूमिबद्दल थोडस काय आहे ना आज गावची आठवण येत आहे आणि मनाच्या कोपर्यात साठ...
-
स्वराज्य समुद्रावर वाढत असताना जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापा...
-
Hey..., Trekkers & Nature Lovers .. Safar Sahyadri Trekkers organise a trek to Kalsubai_Highest Peak of Maharashtra on 23,24 Jun 2018...