सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

किल्ले वसई दुर्गदर्शन 7/12/15 वसई रोड स्टेशन _पश्चिम रेल्वे


वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१] रचना तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर होती. बुरूज किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगण्यात येते. किल्ल्याच्या आतील भागात दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे. किल्ल्यात न्यायालय, तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात चोर वाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत. महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना मराठी नावे दिली होती. कोकणातला बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही. हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकाऱ्याला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात उसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली. सद्यस्थिती वसईच्या किल्ल्यातील चिमाजी अप्पांचा पुतळा किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली. १५-२० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बऱ्याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून, भिंती, बुरूज, तट यांची साफसफाई करून, जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून, पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे.

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

शुभ दिपावली


दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा. संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे.... जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा... स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी... स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही दिवाळी रोज यावी माणसाचा देव व्हावा..... शुभ दीपावली . किरण भालेकर

रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

रक्षाबंधन -पवित्र सण


रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे. स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे. रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे. बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो. भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते. बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते. देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सां‍गितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती. रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते. ''स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील. समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.

बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

भटकंती 3


रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकेळी खिंडी जवळ खांब गाव नजिक सुरगड किल्ल्‌याला देखील भेट देण छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच सुकेळी खिंडीआधी एक रस्ता डाव्या बाजूस जातो आणि त्या रस्त्याने पुढे गेल्यास गाडी रस्ता संपतो आणि जंगलातील मळलेली पायवाट सुरु होते. याच पायवाटेने साधारण २० मिनिटानंतर एक उंच धबधबा दिसतो. त्या धबधब्याचे पडणारे पाणी आणि वाहणारी नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे एक ऐतिहासिक स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि नदीमार्गे कोकणात जाते. पावसाळ्यात उंबरखिंडीत जाणे म्हणजे सर्वाना नक्कीच आवडेल. दुरशेतहून पुढे जांभूळपाड्यामार्गे भेलीव गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्ग आपणास भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्य ात आपले वेगळे रूप दाखवतो. पाली गावालगतच सरसगड हा किल्ला आहे, आणि तेथून पुढे असणारा सुधागड किल्ल्याला देखील पावसाळ्य ात भेट देण मस्तच. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखजवळील मार्लेेशरला पावसाळ्यात जाणे म्हणजे स्वर्गसुखच. तिन्ही बाजूनी उंच डोंगर त्या वरून वाहणारे हजारो छोटे मोठे धबधबे, एका बाजूला वाहणारी नदी, आणि म ह ा द े व ा च् य ा मंदिरामागे असणारा भला मोठा धुवाधार धबधबा काय वर्णावा…. … जबरदस्त…… िं स ध ु द ु ग र् ि ज ल् ह्य ा त ी ल आंबोलीत पावसाळ्य ात बरेच निसर्गप्रेमी, पर्यटक जातात. कारण आंबोली आहेच सुंदर. पण आंबोलीला जाऊन फक्त डोंगर – द-या, धबधबे न पाहता तेथे असलेल्या जैव विविधतेचा अभ्यास करण्यासाठी गेले पाहिजे. कारण या भागात अनेक दुर्मिळ पक्षी, फुले, साप, फुलपाखरे, चतुर, बेडूक, वनस्पती इत्यादी आढळतात. पावसामुळे संपूर्ण परिसर जिवंत होतो. जस माणूस लावणी, पेरणीच्या कामाला सुरुवात करतो त्याचप्रमाणे फुलझाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी, बेडूक, साप, चतुर, फुलपाखरू, पतंग, छोटे-मोठे किडे इत्यादी अनेक सजीवांच्या जीवन चक्रातील हा महत्त्वाचा काळ असतो. प ा व स ा ळ् य ा त फिरण्यास बाहेर पडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्या म्हणजे चांगले शूज, पावसाळी जाकेट, छत्री, सुका खाऊ इ त् य ा द ी आपल्याबरोबर घ्यावेत. आपणास ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणाची माहिती गोळा करावी आणि तिथे जायला यायला लागणारा वेळ लक्षात घ्यावा आणि त्याप्रमाणे आपल्या भटकंतीचे नियोजन करावे. खूप पाऊस असल्यास किंवा एखादा बाका प्रसंग घडल्यास कुठल्याही प्रकारचे डेरिंग न करता स्थानिक लोकांची किंवा पोलिसांची मदत घ्यावी. प्रत्येकाचा पावसाचा आनंद लुटण्याच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. काहीजण गड, किल्ले, ट्रेक्स, जंगल अशा ठिकाणी निसर्गाचा खरोखरीचा आनंद लुटायला जातात तर काही ठिकाणी सध्या पावसाळी भटकंती दरम्यान बरेच तळीराम दृष्टीस पडतात. एक तर अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि असे काही तळीराम भेटल्यास त्यांच्याशी हुज्जत घालू नये. प्रत्येकाने पावसाचा आनंद अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन द्विगुणीत करायलाच हवा. चला तर मग.. पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.. निसर्ग आपली वाट बघतोय.. साभार :गूगल संकलक:किरण भालेकर

भटकंती 2


नंदुरबार येथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे. तेथील जंगल, डोंगर – दर्‍या, पक्षी, रंगीबेरंगी फुले आपले मन प्रसन्न करून टाकतील यात वादच नाही. नाशिक पुढील चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात जाण्याजोगे अजून एक ठिकाण होय. तेथे असलेला कण्हेरगड किल्ला आणि केदारेेशर धबधबा पाहण्यासारखा आहे. चिखलदरा हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासियांचे आवडते ठिकाण. तेथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा इत्यादिसारखी बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत आणि पावसाळ्यात या हिल स्टेशनची मजा काही न्यारीच असते. चिखलदर्‍याहून जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. पावसाळ्यातील दाट जंगल अनुभवायचे असेल तर मेळघाटला भेट देण्याशिवाय पर्याय नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पालादेखील पावसाळ्यात भेट देण उत्तम. मंगळवारखेरीज वर्षभरात कधीही ताडोबाला जाता येते आणि पावसाळ्यातील या जंगलाचे वर्णन करण्यास शब्दच नाहीत, पण या सर्वासाठी तीन ते चार दिवस असावेत. सातारा जिल्ह्यात सध्या एका ठिकाणाचे नाव खूप गाजत आहे………. हो……….. बरोबर ओळखलतं……… कास चे पठार. कासचे पठार म्हणजे महाराष्ट्रातीन व्हॅली ऑफ फ्लोवर्स आहे. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी – पाहण्यासाठी हजारो लोक तेथे भेट देतात. कासबरोबरच साता-याजवळ नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणार्‍या माहुली या ठिकाणी नक्की भेट दिली पाहिजे. त्याचप्रमाणे अजिंक्यतारा, सज्जनगड देखील मस्तच आणि येथून जवळ असलेल्या ठोसेघर धबधब्याची सुंदरता म्हणजे अप्रतिमच होय. सातारहून ८ कि.मी. असणा-या कण्हेर धरणाला सुद्धा भेट देता येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असणा-या पन्हाळगडावर पावसाळ्यात बरेच जण जातात. पावसाळ्यातील पन्हाळगड आणि परिसर सुंदरच दिसतो पण काही लोकांना तेथे वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर पन्हाळगड ते विशाळगड हा पावसाळी ट्रेक नक्की करावा. ज्या वाटेने छत्रपती शिवराय पन्हाळगडाच्या वेढ्याला चकमा देऊन विशाळगडाकडे गेले आणि ज्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या पावनखिंडीहून हा ट्रेक जातो. मसाईचे विस्तीर्ण पठार, शेती, जंगल, ओढे, नदी, नाले, छोटी छोटी गावे अशा ठिकाणांहून हा ट्रेक पूर्ण होतो. ज्यांना पावसाळी थ्रिलिंग अनुभवायचे आहे त्यांना हा ट्रेक म्हणजे पर्वणीच. हा ट्रेक आयुष्यात एकदा तरी करायालाच हवा. मुंबई येथील भरारी गिर्यारोहण संस्था हा ट्रेक गेली १२ वर्षे यशस्वीरित्या आयोजित करते आहे. त्याच प्रमाणे विशाळगडाजवळ असणारा गजापूर ते आंबा आणि आंबा ते साखरपा हा घाटरस्तादेखील धमाल देऊन जातो. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणा-या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटा लगतच कावळ्या नामक किल्ल्याला देखील जाऊ शकतो. पावसाळ्य ात वरंधाघाटाला जाणे म्हणजे एक जबरदस्त अनुभव आहे. डोंगरातून वाहणारे छोटे मोठे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणार छोटास गाव, आणि त्या गावालगत वाहणारी नदी असे वेड लावणार सौंदर्य वरंधाघाटात आहे. वरंधा घाट उतरल्यावर समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य लाभलेले शिवथरघळ येथील गुहा आणि त्या गुहेबाहेर पडणारा पाऊस – धबधबा पाहणे म्हणजे क्या बात है…… महाराष्ट्रात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी काही ठिकाण आहेत की जिथे आपण गुहेच्या आत असतो आणि गुहेबाहेर समोरून पाणी पडत असते. शिवथरघळ हे त्यातील एक ठिकाण आहे. निसर्ग संपन्न असणारे कोंकण पावसाळ्यात अजून सुंदर दिसू लागते. उंच हिरवेगार डोंगर, दुथडी भरून वाहणा-या नद्या, खवळलेला समुद्र, लांबवर पसरलेली हिरवीगार भातशेती आणि शेतीच्या कामाची लगबग असणारी कोंकणातील भोळी भाबडी माणस आणि या सर्वाबरोबर पावसाळ्यातील कोंकण म्हणजे मज्जाच. छत्रपती शिवरायांचे राजधानीचे ठिकाण म्हणजे रायगड. पावसाळ्यात रायगडला जाणे म्हणजे वा…….. ह….. असे म्हणतात की, पावसाळ्यातील रायगड एकदातरी अनुभवा. जे लोक इतर अनेकवेळा रायगडावर गेले आहेत आणि जे लोक पावसाळ्यात गेले आहेत ते या म्हणण्याशी नक्कीच सहमत असतील. साभार :गूगल

भटकंती 1


पाऊस सुरु झाला की लगेचच मित्रमंडळी, कुटुंबियांसोबत या पावसाळ्यात कुठे कुठे जायचे याचे आराखडे बांधाले जातात आणि वेगवेगळ्या स्थळांची माहिती गोळा करण्याची लगबग सुरु होते. परंतु तीच तीच ठिकाणं आणि तिकडची गर्दी आठवली की बर्‍याच जणांचा हिरमोड होतो. म्हणून प्रत्येकाला थोडसं ऑफबीट, वेगळ्या ठिकाणी जायला नक्की आवडेल. महाराष्ट्राचा संपूर्ण प्रदेश नितांत सुंदर आहे. महाराष्ट्राला सुंदर सागरी किनारा, अनेक नद्या तसेच सह्याद्री-सातपुडासारख्या डोंगररांगा, जंगल, अभयारण्ये, मंदिरे, गडकिल्ले, इत्यादी ब-याच गोष्टी लाभलेल्या आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि इतिहासदेखील लाभला आहे. मुंबई ते चंद्रपूर आणि सावंतवाडी ते तोरणमाळ या संपूर्ण प्रदेशात पावसाळ्यात जाण्यासाठी बरीच ठिकाण आहेत. पुण्याजवळच असलेली ज्ञानदेवांची आळंदी, तुकोबारायांचा भंडारा डोंगर, देहू, संभाजी महाराजांचे स्मारक असलेले आणि नदी संगमावर वसलेले तुळापूर, तसेच राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर, सोनोरी, इत्यादीसारखे बरेच किल्ले आहेत. त्याचप्रमाणे लोणावळ्याचे भुशी धरण, त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी बरीच लोक जातात पण तेथून जवळच असलेला कोरीगड, तैल बैला, घनगड, कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच मजा आहे. लोणावळ्याजवळील कार्ला – भाजे लेण्या, लोहगड , विसापूर, राजमाची, तुंग, तिकोना यासारखे किल्लेदेखील एका दिवसात भेट देण्याजोगी ठिकाण आहेत. तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो आणि हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल द-याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो. याच रस्त्यावर विंझणे गावात विंझाई देवीचे सुंदर मंदिर आहे आणि त्या मागे एक अतिशय चांगले जंगल आहे. हे जंगल निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवनच आहे. येथे विविध प्रकारचे साप, बेडूक, पशु-पक्षी, फुल पाखरे, वनस्पती इत्यादीचा अभ्यास करता येईल. माळशेज घाटाचे सौंदर्य बर्‍याचजणांनी अनुभवले असेल पण त्याचबरोबर माळशेजघाटा आधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे. याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे ट्रेकसुद्धा करू शकतो. मुरबाड माळशेज रस्त्यावर वैशाखरेहून पावसाळ्यात ट्रेक करण म्हणजे एक वेगळच थ्रिल आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार – म्हणजे गरिबांचे महाबळेेशर असा ज्याचा उल्लेख केला जातो असे एक वेगळे आणि डोंगर- द-या, असंख्य धबधबे, दूरवर पसरलेली भातशेती, यांनी नटलेले छोटेसे हिल स्टेशन असून पावसाळ्यात हे अतिशय सुंदर दिसते. तेथील राजवाडा, हनुमान टेकडी, शिर्पा माळ, दाभोसा धबधबा इत्यादी ठिकाण पाहण्यासारखी असून, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी – कातकरी लोकांचे राहणीमान बघण्याचे जव्हार हे उत्तम ठिकाण आहे. जव्हारहून कसार्‍याला जाणार्‍या रस्त्यावर देवबांध या गावी नदी किनारी गणपतीचे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि याच रस्त्याने पुढे गेल्यावर कसार्‍या घाटाअलीकडे बळवंतगड हा छोटासा किल्ला देखील पाहण्यासारखा आहे. जव्हारहून मोखाडमार्गे त्र्यंबकेश्‍वर येथे जाता येते. त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन घेऊन ब्रम्हगिरी पर्वतावर जाताना वाटेत अनेक धबधबे आपले मन मोहून टाकतात. येथे ब्रम्हगिरी पर्वताची परिक्रमा देखील करता येते. ही परिक्रमा करताना छोटे मोठे ओढे, उंच डोंगरावरून पडणारे धबधबे इत्यादी बघताना परिक्रमा कधी पूर्ण होते हे कळतच नाही. त्याच प्रमाणे नाशिक त्र्यंबकेेशर परिसरात असणारे कावनई, गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादीसारख्या ब-याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते. ठाणे जिल्ह्यातील वाडा या गजबजलेल्या गावापासून एक रस्ता जंगलातून नदी किना-याहून वासिंदला जातो. माहुली किल्ल्याच्या मागे असणा- या या रस्त्याने पावसाळ्यात जाणे म्हणजे धमालच आहे. त्याचप्रमाणे ठाणे – नाशिक महामार्गावर आटगावहून तानसा अभयारण्याकडे जाणारा रस्ता आहे आणि याच महामार्गाजवळ भातसा धारणाकडे जाणारा रस्ता आहे, इथेदेखील एक दिवसीय पावसाळी सहलीला जाण्यासाठी काहीच हरकत नाही. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणारे कळसुबाई आणि तेथून जवळच असणारा भंडारदरा, रंध धबधबा येथे पावसाळ्यात भेट देणे म्हणजे ऐशच. भंडारद-या जवळ असणारे अमृतेेशर मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे येथील साम्रात गावाजवळील सांधण दरी आपले पैसे वसूल करते. रतनगड किल्लादेखील याच परिसरात असून अनेक ट्रेकर्स मंडळी रतनगड ते हरिश्चंद्रगड असा ट्रैक देखील करतात. साभार :गूगल

रविवार, २ ऑगस्ट, २०१५

भीमाशंकर _शिडीघाट,गणेशघाट


खुप दिवसांत घराबाहेर पडणे जमले नाही त्यामुळे स्वभाव थोडासा चिडचिडा बनला होता.महिन्यातून एक वारी सह्याद्रीत झाली नाही तर आमच्यासारख्या गिरीमित्रांना चैन पडत नाही. रोज इंटरनेटवर गड़कोटांची माहिती जमा करणे आणि मोहिमांची आखणी करणे हा आमचा नित्याचा उद्योग.10 ते 12 ट्रेकिंगचे प्लान अगदी हिशोबासकट पाठ.यापैकी प्रत्यक्षात किती उतरतात आणि कागदावर किती हा कळीचा विषय आहे.त्यात भरीसभर रविवारी सुट्टी नाही.मग सगळे जग घरी आणि आम्ही मात्र कामावर आणि सोमवारी सगळे जग कामावर आम्ही मात्र घरी ...रटाळवाणे आयुष्य म्हणजे नेमके काय?हे एव्हाना कळले होते. या सर्व व्यापातुन एक दिवस चक्क ऑफिसला दांडी मारून केलेल्या भीमाशंकर ट्रैकच्या आठवणी आपल्यासमोर ठेवत आहे. नेटवर सर्च करत असताना एक दिवस भीमाशंकर ट्रैकविषयी कळले आणि त्यात 3500 फुट.महटल्यावर आमच्यातले ट्रेकिंगचे भुत काही स्वस्थ बसु देईना.यात्रीसह्याद्री ट्रेकर्स मुंबई यांनी हा ट्रैक आयोजित केला होता.बऱ्याच जणांना आवताणे निमंत्रणे पाठवुन झाली.परंतु काहीच प्रतिसाद आला नाही त्यामुळे थोड्याशा रागामध्ये तडकाफडकी भीमाशंकर ट्रैकसाठी नोंदणी करुन मोकळा झालो.ट्रैकच्या एक दिवस अगोदर माझा कॉलेजचा मित्र प्रीतम कातकर ट्रैकसाठी तयार असल्याचे कळले.संध्याकाळी त्याला जावून भेटलो आणि त्याची सुद्धा नोंदणी केली. बोरीवलीतुन बसने रात्री 11 वाजता प्रवासाला सुरुवात झाली.प्रितेश पिसाळ आणि दत्ता हे दोन TeamLeader होते.त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आणि आम्ही मार्गस्थ झालो.बांद्रा,सायन,चेंबूर,वाशी,पनवेल या मार्गाने आम्ही Base Village खांडस गावात पोहोचेपर्यंत 3 वाजून गेले होते.गावामध्ये विश्रांतीसाठी घराची सोय करण्यात आली होती.बऱ्याच दिवसांनी गावच्या कौलारु घरात आरामात पहुडलो होतो मग काय कोकणातल्या माझ्या घराची आठवण आल्याशिवाय कशी राहील ! ट्रेकिंगसाठी बाहेर जाताना मी कधीही झोपत नाही चांगल्या ट्रेकर्सचे ते एक खास लक्षण आहे आणि ते माझ्यामध्ये अनुभवानेच आले आहे.बरोबर 5चा अलार्म वाजला आणि त्याच आठवणींच्या गर्तेतून बाहेर आलो. सर्व आवश्यक सामान घेवून व्यवस्थीत बॅग भरली. ट्रैकिंगची माझी आवडती रेड जर्सी,ट्रॅकपैंट,शूज आणि पाठीवर सैक घेवून सज्ज झालो.तोपर्यंत गरमागरम कांदापोहे घरातील काकानी नाश्त्यासाठी तयार केले होते.1 Plate कांदापोहे पोटात ढकलले आणि निघालो. घराच्या अंगणात पाऊल ठेवतो न ठेवतोय तोच पावसाने पहिली सलामी दिली.माझा आनंद तर गगनात मावेना.कारण काय तर आज मनमुराद भिजायला मिळणार याची खात्री पटली होती. 6वाजले होते सर्वजण वाटेला लागले.मध्येच पावसाची एक सर ओलीचिंब करून जात होती. भिमाशंकरला जाण्याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत.1)शिडीघाट 2)गणेशघाट. काठेवाडी गावातील पुलाच्या येथे वाहनतळ आहे.पुलाच्या उजवीकडे सरळ रस्ता जातो तो गणेशघाटाला मिळतो.आणि पुलाच्या समोर जी वाट जाते ती शिडीघाटाकडे जाते. सर्वसाधारणपणे मुंबईतील ट्रैकर्स क्लब शिडी घाटाने चढाई करून गणेश घाटाने उतरणे पसंत करतात.शिडी घाटाच्या सुरुवातीला एक विहीर लागते.तिथे गोलाकार उभे राहून नेहमीप्रमाणे ओळखपरेड झाली.आमचा एकुण 26 जणांचा ग्रुप होता.त्यातले 15 जण नवखे ट्रेकर्स.सह्याद्री म्हणजे काय चीज आहे हे कदाचित त्यांना ठावुक नसणार.त्यांचा अतिउत्साह आणि जोश बघुन मला हसु येत होतं.सर्व आवश्यक सूचना दिल्यानंतर आम्ही निघालो.सरळ पठारावर आल्यावर पहिल्या सह्यकड्याने दर्शन दिले. अजस्त्र ताशीव कातळकडा आणि त्यावरून पडणारे धबधबे ...अतिशय मनोहर दृश्य आठवणींच्या कैमेऱ्यात कायमचे कैद झाले.इथे एक मस्त ग्रुपफोटो घेण्यात आला.पुढे वाटेतच जोरदार आवाज करत वाहणारा ओढा नजरेस पडतो.इथे पाण्यात भिजण्याचा व फोटोग्राफीचा मोह काही केल्या आवरत नाही. पायवाट संपून आता सरळ जंगलात घुसलो.वादळी पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून वाटा बंद झालेल्या होत्या.दत्ता सर थोडेशेे बावचळल्यासारखे वाटले त्यांच्यावर बाकीच्या मेंबरची जबाबदारी होती त्यामुळे ते पाठी थांबले.आणि मी आणि माझा मित्र पुढे होऊन वाट शोधु लागलो.सोबत 2 कुत्रे होते त्यामुळे वाट शोधणे आणखी सोपे गेले.पहिल्या शिडीपर्यन्त 1.30 तासाची मजल आम्ही मारली होती. शिडीजवळच परत एक कातळकडा आणि त्यावरून कोसळणारा जलप्रपात ... तुम्ही कितीही मनाशी ठरवा पण या धबधब्याखाली पूर्ण समाधान होईपर्यन्त भिजल्याशिवाय शिडीला स्पर्श करणार नाही याची माझ्याकडे Gurantee आहे. शिडी अत्यंत मजबूत अवस्थेत आहे पण 2 टप्पे असल्यामुळे एकावेळी एकच व्यक्ती चढू शकते.शिडी पार केल्यानंतर विसाव्यासाठी गुहेसारखी जागा आहे.आणि तोंडासमोरच प्रचंड आवाज करत कोसळणारा धबधबा..आणि बरोबर डाव्या हाताला पदरगडाचा मनमोहक देखावा आपले लक्ष वेधुन घेतो. या Patch नंतर लगेचच दूसरी शिडी आपले स्वागत करते.हि शिडी स्वताबरोबर आपल्याला पण हलवते.शिडी पार केली की अगदी कड्याच्या बाजूने सरळ वाट पुढे सरकते. येथेसुद्धा एक मस्त धबधबा आहे.जिकडे पहाल तिकडे फक्त धबधबे आणि अजस्त्र कातळकडेच दृष्टीस पडतील.गिरीमित्रांसाठी भीमाशंकर ट्रैकसारखा दूसरा स्वर्ग असुच शकत नाही याची मला खात्री पटली आहे. हा धबधबा पार केल्यावर एक सरळसोट कडा आहे.याला ट्रेकर्सवाले Traverse असे संबोधतात.ईथे नवख्या ट्रेकरसाठी रोपची गरज भासु शकते.आमच्या क्लबने येथे रोपची सोय केली होती. हा patch रोपशिवाय पार केला. हा patch पार करतोय तोपर्यंत Rockpatch सामोरा येतो.उंच दगडाला डावीकडून उजवीकडे प्रदक्षिणा करत हा patch पार होतो. मानसिक क्षमतेची परीक्षा घेणारा असा हा patch आहे. हा पार झाल्यावर शिडीघाट थोड्याच वेळात संपतो.आणि आपल्याला झोपडीचे दर्शन होते.इथपर्यंत 2000 फुट अंतर 4 तासामध्ये पार झाले.गणेश घाटातून येणारा रस्ता सुद्धा याच ठिकाणी एकत्र मिळतो.येथील स्थानिक गावकरी यांनी ईथे चहा,भाजलेल्या मक्याची कणसे लींबु सरबत याची व्यवस्था केली आहे.गवती चहापत्तीचा फक्कड चहा इथली खासियत आहे. वाढत्या पर्यटनामुळे त्यांचा रोजगार प्रश्न मार्गी लागला आहे हे बघुन समाधान वाटले. किरण भालेकर

रविवार, १४ जून, २०१५

माणुस मी .....

माणूस म्हणून जन्मलेला माणूस माणसासाठी जगत असतो आपल्या सिमित आयुष्याला नवे अर्थ लावत असतो मनातल्या लहरींवर स्वार होऊन माणसांच्या समुद्रात पोहत असतो एखाद्या मोठ्या लाटे खाली चिंब चिंब भिजत असतो किनार्‍यावर असतांना तो त्याच लाटेची वाट पहातो इतर लहान लहरी आल्या तरी तिथेच बसून टिपं गाळतो रागावलेल्या माणसालाही सागराकडेच जावं लागतं दुसर्‍या माणसांच्या लहरींनाही आपल्या कवेत घ्यावं लागतं माणसाचा हात धरून चालणारा माणूस मी हरवलेल्या लाटेला शिधणारा माणूस मी खडकावर आदळूनही खिदळणारा माणूस मी बर्फासारखा थंड तरी पिघळणारा माणूस मी क्षितिजावरील आकांशांकडे पोहणारा माणूस मी रोज मावळत्या सूर्यासंगे उगवणारा माणूस मी साभार:मराठीमाती वेब पोट्रल

शुक्रवार, १२ जून, २०१५

गणपतीपुळे _गणेश मंदिर

रत्नागिरी जिल्ह्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे. गणपतीपुळे, पावस, आडिवरे, मार्लेश्वर, कसबा, अशी अनेक तीर्थक्षेत्रे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. सा-या बाजूंनी रत्नागिरी जिल्हा समृद्ध आहे. अगदी तिथल्या माणसांपासून ते निसर्गापर्यंत सारं काही आपलंसं करणारे आहे. कोकणातली माणसं तर त्यांच्या अगत्यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोकणदेखील आपल्याला कायमच खुणावत असतं. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. स्वयंभू गणेशाचे हे स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्यअसे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे. किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल. मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेच आपण किना-यावरच उतरतो. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू तर दुस-या बाजूला खडकाळ प्रदेश असे हे अनोखे आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणा-या दुर्वा मात्र तिथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनमोहक आहे. राहण्यासाठी खोल्या : गणपतीपुळे यथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. कसे जावे : मुंबई गोवा महामार्गावर निवली पासून एक रस्ता आहे .रत्नागिरी शहरापासून नेवरे -कोतवडे मार्गे गणपतीपुळे जाण्यासाठी देखील सहज शक्य आहे .गणपतीपुळे देखील मालगुंड पासून जयगड रोड , वरवडे बाजूला जोडलेले आहे . विमान: जवळचे विमानतळ बेळगाव , 299 किमी आहे. रेल्वे : तसेच रेल्वेने देखील पर्यटक रत्नागिरीला उतरून गणपतीपुळ्याला जाऊ शकतात. बस: गणपतीपुळे रत्नागिरीपासून सुमारे ४० कि. मी. लांब आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे थेट बससेवा पुरवते. जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे: गणपतीपुळे समुद्रकिनारा , मालगुंड , पावस , मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा , डेरवण , परशुराम मंदिर , जयगड किल्ला साभार:गूगल ब्लॉग. संकलन:किरण भालेकर

शनिवार, ३० मे, २०१५

कुठेतरी छानसे वाचलेले....

" सर, ताक घ्या ना. फक्त १० रुपये " फाटक्या कपड्यातील एक चिमुरडी माझ्या समोर ताकाचा ग्लास धरून उभी होती. तिच्याही तोंडी "सर" शब्द आला हे ऐकून वाईट वाटलं. कारण ठिकाण होतं रायगड किल्ला. ३५० पेक्षा जास्त वर्ष उनपावसाचा मारा सहन करूनही टिकून राहिलेल्या दगडी पायर्यांवर ही मुलगी हातात ताकाची एक किटली, चार ग्लास आणि ग्लास धुवायला बादली घेवून बसली होती. मी ताक घेतलं आणि पिताना तिच्याकडे पाहू लागलो. हाडाची काड झालेली. अजून दुधाचे दात पडले नव्हते आणि पोटाच खळग भरण्यासाठी काबाडकष्ट करू लागली होती. शिवाजी महाराज गेले आणि अश्या असंख्य कष्टकर्यांची रयाच गेली. रायगड भग्न होत गेला आणि ह्यांचं जीवन त्यापेक्षा जास्त भयाण झालं. त्यानंतर अनेक सत्ता आल्या-गेल्या. पण रायगडावर राहणाऱ्या ह्या कष्टाळू लोकांचे कपडे जास्त फाटत गेले. एकेकाळी ह्या रायगडावर आरोळी उठत असे, " चल मर्दा, उपस तलवार. शत्रू कोकणात उतरतोय. आमची शेती जळेल अन आया-बहिणीची अब्रूबी शिल्लक रहायची नाही." मग सपासप तलवारी तळपू लागायच्या. " जय जिजाउ , जय शिवराय ...हर हर महादेव ....यळकोट यळकोट जय मल्हार" सगळे रांगडे गडी शत्रूवर तुटून पडायचे. कांदा भाकर खाणारे मुठभर मावळे दहा हजार फौजेवर काही कळायच्या आधीच हल्ला करायचे. शत्रू तोफेत गोळे भरायला निघायाचा, तोवर मावळ्यांनी अनेकांच्या खांडोळ्या केलेल्या असायच्या. शत्रूच नाही तर महापराक्रम गाजवलेली ती क्रूर तोफसुध्धा शरण यायची. मावळे एका हातात तलवार, आणि एका हातात मृत्यू घेवून फिरत...फक्त महाराजांसाठी!! "सर, अजून एक ताक घ्या ना, फक्त दहा रुपये" मी भानावर आलो. इतिहास इतिहासजमा झाला आणि वर्तमानात उरली दिवसभर रायगडावर ताक विकत फिरणारी ही कन्या. एक ग्लास ताक पिवून झालं होतं. तरीही अस वाटलं आणखी एक ग्लास पिवूया. कारण त्याबदल्यात तिला जे पैसे द्यावे लागतील, तो फक्त तिचा" profit " नसेल तर कष्टाला दिलेली सलामीही ठरेल. हल्ली ह्या कष्टाला कोण सलामी देतं? सिनेस्टार्स, क्रिकेट खेळाडू, गायक आणि राजकारणी ह्यांना पद्म पुरस्कार मिळतात आणि दिवसभर उन्हात उभं राहून ताक विकणाऱ्या मुलीला मिळतात एका ग्लासामागे दहा रुपये. मी तिला विचारलं, "शाळेत जाते का ?" तिने उत्तर दिलं, "जातो की..आम्ही गडावरची सारी मुलं खाली पाचाडमध्ये शाळेत जातो." मी थक्क झालो. अंदाजे १५०० पायर्या उतरून- पुन्हा चढून ही मुले शाळेतही जात होती. रायगडाची उंची आहे 1,३५६ मीटर. पण ह्या इवल्याश्या पोरांची कर्तबगारी आहे आसमंताला भिडणारी. ती मोजायची तर मीटरमध्ये मोजता येत नाही. मीटर त्या शाळेत जाणार्या मुलांना मोजावे लागतात, जे school bus मधून शाळेत जातात-येतात... घरपोच!! इथे रायगडावरील आणि इतर गडांवरील मुले उरलेल्या वेळेत ताक, लिंबू सरबत विकून चार पैसे कमावतात. महाराजांनी चारी बाजूने आक्रमण होतं असूनही स्वराज्य आणलं ते अश्याच गड्यांच्या बळावर...हे जग चालतं ते अश्याच कष्टकर्यांच्या जोरावर .. --असाच एक वाचनात आलेला सुंदरसा लेख ..

शुक्रवार, २९ मे, २०१५

लेखणी बरसु लागते तेव्हा.....

बरेच दिवस झाले लेखणी शांतपणे एका कोपर्यात पहुडली होती.कदाचित तिची मला आठवण झाली नसावी.ही लेखणीच माझी खऱ्या अर्थाने सोबतीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.कुठेतरी व्यक्त होण्याची मी संधी पाहत असतो आणि ती मला यामधुन मिळते.प्रसंग लिखाण आणि टिकात्मक लिखाण यावरच माझा जास्त भर असतो. आज अचानक काही गोष्टी नजरेसमोर आल्या म्हणजे तश्या जुन्याच आहेत पण मला मात्र नवख्याच वाटु लागल्या.डोळ्यातली विझत आलेली आग पुन्हा धगधगुन पेटायला लागली.लिखाणातून परत एकदा बरसु लागली. महाभारतात अर्जुनाला सुद्धा स्वकीयांविरुद्ध शस्त्र उचलणे भाग पडले.इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाऊ व्यंकोजी राजे यांच्याविरुद्ध शस्त्र उगारावे लागले होते.आणि महाराजांचा हाच आदर्श प्रमाण मानून आपल्याच स्वजनांविरुद्ध लेखणी चालविताना आमचे हात डगमगणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ म्हणजे महा+राष्ट्र=महाराष्ट्र होय.महा म्हणजेच मराठा आणि या मराठयांचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय.तर अशा या महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, शिवकालीन मराठी घराणी आजही वास्तव्यास आहेत.यातीलच काही मराठा घराण्यानी वतनाच्या ,सत्तेच्या लोभापायी वर्षानुवर्ष सुलतानांची चाकरी करण्यातच धन्यता मानली.सुलतानांच्या दरबारातले मातब्बर सरदार म्हणून हेच मराठे नावारूपास आले.त्यांची आता नावे घेत नाही सुजाण वाचकांस ते ठावुक असेल यात तिळमात्र शंका नाही. यातीलच काहीजण आजही सुलतानांनी दिलेली वतने ,किताब लाखमोलाने मिरवत आहेत.जनतेची दिशाभूल करत आहेत .त्यांना उसने अवसान आणून सांगत आहेत कि आम्ही इतिहासात अशी कामगिरी केली.आपल्या नावापुढे खुशाल राजे लावण्यात यांना अभिमान वाटतो.आम्ही या प्रांताचे राजे,त्या प्रांताचे खोत,कोकणचे राजे ...... काहीजण तर सुलतानराव असे किताब मिरवत आहेत.या लोकांना लाज तरी कशी वाटत नाही?ज्यांच्या नावातच अर्थ दडलेला आहे तोसुद्धा या मुर्खाना कळत नाही.सुलतान सम्राटांनी दिलेले किताब कोणते आणि महाराजांनी केलेले गौरव कोणते?हे कळन्याइतपत आम्ही मुर्ख नाही.त्यामुळे अशा लोकांनी आमच्यापासून दोन हात लांब राहणेच त्यांच्यासाठी सोईस्कर जाईल. याच मराठ्यानी शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेसाठी मदत केली असती तर आजचा इतिहास काहीतरी वेगळा असू शकला असता.फितुरी ,गृहकलह याचा मराठयांना पिढ्यानपिढ्या शाप आहे.इंग्रजांनी याचाच फायदा घेतला .तोडा,फोडा आणि राज्य करा या नितिचा वापर करुन देशाची विभागणी करुन ते निघुन गेले आणि जाता जाता भांडण लावून गेले.आजही त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. आताही आमच्यामध्ये एकी निर्माण झालेली नाही.एकमेंका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ.या वचनाचा आम्हाला विसर पडला आहे.आपलेच भाऊबंद वरच्या पायरीवर जात असतील तर आपण त्यांना तळाची पायरी दाखवून आसुरी आनंद साजरा करत आहोत.इतिहासात पण आपण हेच करत आलो आहोत आणि आताही परिस्तिथी काही वेगळी नाही . काय करू शब्द खुप आहेत पण लिहिन्याची इच्छा नाही. Bhalekar117.blogspot.com किरण भालेकर

बुधवार, २७ मे, २०१५

ट्रेकर्सची लक्षणे

१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात . त्यातहीकिंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या . काही ट्रेकर्स असेहीअसतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात २.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही ३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे * सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्याभाषेत पिट्टूम्हणतात . त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते. * शुक्रवार रात्र: निघायची तयारी …ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्टपाउच (ही एकखासचीज आहे …हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकरअसल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट * शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट …काही ट्रेकर्सउघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात ४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे * सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय …नाईलाजाने. * शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली … ही trek साठी भेटण्याची जागा. * शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand * शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह ५.अन्य विशेष लकबी: * हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसर्या club बरोबरट्रेकला जातात * ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत …. साधी गोळी जरी खाल्लीतरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात . कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो . पणकिल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात त्यातही त्यांची फारशी चूकनसते . रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते * बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी * यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्येप्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटीडबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी यांचा wastepouch ही एक धमाल चीजअसते : यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असतेएका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला सैक सुद्धा अशी सुरेखभरतील की पाहत रहावं . ६.खाण्या पिण्याच्या सवयी: * कशालाही नाही म्हणणार नाहीत हवे ते हक्काने मागून घेणार * काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी * पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचेझाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणिथोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही ७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने: * खणखणित आवाजात पोवाडे गाणे * जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे * बैटिंग ला जाणे ८.यांची दैवते: * offcourse शिवाजी महाराज * रायगडचा जगदीश्वर * हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर इ . इ . ९.यांची तिर्थस्थळे: * राजमाचीचा तलाव * बाण चा ब्लू लगून * नाणे घाटातील केव्ह * कोंकण कडा इ . इ . आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणेप्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते १०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज * यांना मुली आवडत नाहीत काही म्हणी आणि वाक्प्रचार : * खाईन तर तुपाशी नाहीतर……… adjust करेन * वाट पाहीन पण एस टी नेच जाईन * केव मध्ये “आला वारा गेला वारा” तो कुणाचा सोयरा * An alive ordinary rock climber is always better than an excellent dead rock climber !!! महाजालवरुन साभार .

राजा शिवछत्रपती...

इतिहासाला जशी तमा नाही इथल्या पराक्रमाची, मोडेल पण वाकणार नाही अशी आण असे आम्हां शिवरायांची, ईथे गडकोटांना साथ मिळते गगनभेदी सहयाद्रीची माणसाने माणूस जोडावा हिच शिकवण आमुच्या मराठी संस्कृतीची, संकटांना आशा असते धैर्याने सामोरे जाण्याची जय शिवराय...

मंगळवार, २१ एप्रिल, २०१५

राजा शिवछत्रपती..

प्रोढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास” ब्राम्हण सत्ताधारी, वॆश्य व्यापारी आणि यांची सेवा करण्यासाठी क्षुद्र असा संकोचित विचार रुजवीला गेला व देश हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधार कोठडीत नेऊन टाकला. अशा वेळी महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण भारत गुलामगिरीच्या कोठडीतुन बाहेर काढणारा राजा शिवाजी हा क्षत्रिय कुलावंतास म्हणजे क्षत्रियांची पराक्रमाची गाथा सुरू करणारा ’युग पुरुष’ होय. म्हणुनच शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी, “प्रॊढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास” अशी घोषणा केली. महारष्ट्रातील धर्मपंडीतांनी पुन्हा हे घोष वाक्य बदलुन गेली अनेक दशके “गोब्राम्हण प्रतिपालक राजाधिराज शिवाजी महाराज” असे सांगुन पुन्हा हे राष्ट्र गुलाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. इंद्रजालवरुन साभार...

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

गोळवशी -माझं गाव

लांजा तालुक्यात साटवली रोडला वसलेले माझ गोळवशी गांव .माझ्या या जन्मभूमिबद्दल थोडस काय आहे ना आज गावची आठवण येत आहे आणि मनाच्या कोपर्यात साठवून ठेवलेल्या आठवणींचा कप्पा अलगद उफाळून वरती येऊ पहात आहे आणि त्याला बंद करणे माझ्याच्याने तरी शकय नाही .या आठवणींची पण वेगळीच गम्मत आहे.काही आठवणी रडता रडता हसवायला लावणाऱ्या तर काही हसता हसता डोळ्यात अश्रु आणणारया,काही अबोल तर काही अविस्मरणीय .गावच्या आठवणीबद्दल माज हेच मत आहे या आठवणी कधींही न विसरता येणाऱ्या -अनमोल याबद्दल प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात.परंतु आमच्यासारख्या गांव सोडून कामधंद्यानिमीत्त मुंबईत स्थायिक ज़ालेल्या लोकांच्या गावच्या आठवणी काहिशा भावुक असतात. गोळवशी गांव महाराष्ट्राला नविन नाही.गावची ग्रामदेवता आई नागादेवीची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे.महाराष्ट्राच्या कनाकोपर्यातून भक्तगण आई नागादेवीच्या दर्शनाला येत असतात.आमच्या गावचा बायंगी देव खुप प्रसिद्ध आहे.त्यामुळे कोणी मस्करीमध्ये विचारल की तू कुठला रे ?त्यावर मी म्हणतो लांज्याचा.मग समोरचा परत बोलतो लांज्यात कुठे ?त्यावर मी म्हणतो गोळवशी. पुढचा माणूस अतिशय अदबीने बोलायला लागतो.ज्यांना आमच्या गावची महती माहित आहे ते आमच्या वाट्याला जात नाहीत.याचे कैक अनुभव आहेत.माझे आजोबा असे सांगायचे कि पूर्वी आमच्या गावातील आंबा,काजु जमिनीवर जरी पडलेले असले तरी ते उचलण्याची हिंमत आजुबाजूच्या गावातील लोक करत नसत.इतके सगळे वचकुन असत.आणि आजही 2015 साली परिस्तिथी काही वेगळी नाही. तुम्हाला म्हणून सांगतो मित्रहो आम्ही क्रिकेट स्पर्धांसाठी पंचक्रोशी,तालुक्यामध्ये खेळायला जातो.आमच्या संघाच नाव आहे नागादेवी गोळवशी.समोरच्या टिमच्या तुलनेत आमच्याकडे सगळे लींबु-टिंबूचा भरणा असतो.समोरची टीम अगदी जिंकायला आलेली असते .अचानक सामन्याचा रंग पालटतो प्रतिस्पर्धी टिमच्या हातातोंडाशी असलेला घास आम्ही हिरावुन घेतो.समोरचे बिच्चारे अक्षरशः रडत मैदान सोडतात .जाता जाता म्हणतात कि बायंगी उठवलानी वाटत .हसून हसून पोट दुखायची वेळ येते.म्हणतात ना ते नावात काय आहे?नावात बरंच काही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला हा गांव.राजापुरला जाताना शिवाजी महाराज गावातुन नदीपार करुन गेले.आणि इंग्रजांची वखार लुटली.गावाच्या सिमेवरून मुचकुंदी नदी वाहते.विशाळगडाच्या पायथ्याला नदिचा उगम होतो.नदिला बारमाही पाणी असते.नदी पुढे पूर्णगडच्या खाडीला मिळते.

मंगळवार, १० मार्च, २०१५

शिवजयंती आणि सत्यनारायण पूजा .....

दि:8 मार्च 2015 तिथिनुसार शिवजयंती महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेना आणि शिवजयंती हे अविभाज्य समीकरण आहे.लोकमान्य टिळकांनी चालू केलेली शिवजयंती आणि गणेशउत्सव बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे जपले आणि मराठी माणूससुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.मराठी माणूस जेथे जेथे गेला तिथे त्याने हे उत्सव साजरे केले.आणि आपल्या परंपरा चालिरिती यांची जपणूक केली.म्हणूनच आजही परदेशामध्ये आजही हे उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. हे बघितल्यावर आमची छाती गर्वाने आणि अभिमानाने भरून येते.असो . आज जरा एका वेगळ्याच विषयवार घसरतोय .समाजामध्ये वाढत चाललेली ब्राम्हणी पद्धत आणि पूजेअर्चेच माजलेल स्तोम यांना फटकारण खुप गरजेचे आहे .यासाठीच हा अट्टाहास. काल आमच्या विभागात सुद्धा शिवसेना आणि मनसेतर्फे शिवजयंती मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरी केली गेली.याबद्दल प्रथम सर्वांच अभिनदंन करतो.आणि काय आपल्या विषयाला सुरुवात करुया. शिवजयंती आणि सत्यनारायण पूजा यांचा काडीमात्र संबंध आहे का ?महाराजानी स्वराज्यनिर्मितीसाठी सत्यनारायणाची पूजा केली होती काय ?हे माझ्या तर ऐकिवात नाही किंवा आजपर्यन्तच्या वाचनात नाही.कदाचित आपण विसरला असाल कि शिवरायांनी स्वराज्यस्थापनेची शपथ घेताना आपल्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वरवार केला होता.मग काय हा दुर्दैवविलास ?त्यांच्याच जयंतीला आपण समोर त्यांचा फोटो ठेवून सत्यनारायणाची पूजा करत बसलो आहोत .हे बघुन त्यांना काय यातना झाल्या असतील याचा आपण कधी विचार केलाय ?रस्त्यावर शिवजयंतीचे काल मोठे मोठे फलक झळकत होते.पण राजे त्यात तुम्ही नजरेस येत न्हवता.पुढाऱ्यानी आपल मार्जिन कमी होतं म्हणून तुमचा फ़ोटोला एका कोपर्यात मोजूनमापुन बसवला होता.आणि त्याच्याखाली लिहिल होत प्रमुख कार्यक्रम :सत्यनारायणाची महापूजा.भाविकानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. राजे काल शिवजयंतीला उपस्थित राहून तुम्हाला अभिवादन करणारा तुमचा कट्टर मावळा मला कुठेच दिसत नहवता तो कुठेतरी हरवला होता.दिसत होता तो फ़क्त डीजेच्या तालावर नाचनारा आजचा तरुण आणि भगवा सदरा घालून गर्दीत मिरवणारा आजचा नेता राजे मला वाटल होत आजतरी मराठी माणूस एकत्र येईल पण त्याला तुमच्यासाठी वेळच भेटला नाही .राजे तुमच्या नावावर आजपर्यंत कितीतरी जण मोठे झाले आणि अजूनही होत राहतील याची आम्हाला खात्री आहे. राजे आज संभाजी राजांची महाराष्ट्राला खरी गरज आहे .ब्राम्हण लोकांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी समाजामध्ये देवाच्या नावावर धंदा सुरु केला आहे.सत्यनारायण पूजेचा नविन धंदा त्यांनी निर्माण केला आहे.समाजातील निरक्षरता ,अंधश्रद्धा यांचा त्यांनी आपल्या स्वार्थसाठी उपयोग करुन घेतला आहे आणि आपल दुर्दैव म्हणजे साक्षर लोक सुद्धा या प्रकाराला बळी पडत आहेत. आजकाल राजे सत्यनारायणाची पूजा त्या फैशन-शो सारखी झाली आहे .गणपती बाप्पा आले कार्यक्रम काय तर सत्यनारायण पूजा आहे .टिळकांनी गणेश उत्सव का स्थापन केला? याचाच आम्हाला विसर पडलाय.त्यात कोणी दिडशहाणा भेटला आणि त्याला विचारल की का रे बाबा सत्यनारायण पूजा तुम्ही का करता ?उत्तर अनपेक्षित अस नातेवाईक एकत्र येतात.मुलाच लग्न ठराव म्हणून ,घरात सुखशांती नांदावी म्हणून,शेजारयांनी केली म्हणून अशी अनेक उत्तरे ऐकून मीच खजील झालो.हल्ली तर लग्न झाल की हमखास सत्यनारायण पूजा असनारच.महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या कुठल्याही लग्नाची पत्रिका उघडून पहा.पूजेचा रकाना असल्याशिवाय राहणार नाही.अहो लग्न ठरवायच्या अगोदर पूजा कधी घालायची यावरून वधु-वर पक्षात वाद सुरु असतात .ही आजची वस्तुस्तिथी आहे. नवरात्र उत्सव आला कार्यक्रम काय? सत्यनारायण महापूजा एकीकडे आपण दुर्गादेवीची पूजा करतोय आणि दुसरीकडे सत्यनारायण महाराज .पाया पडायला येणारी लोक कोणत्या देवाच्या पाया पडू या संभ्रमात असतात.आणि मग ते सत्यनारायणाच्या पाया पडतात आणि मोकळे होतात. किरण भालेकर

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५

रतनगड ट्रैक स्टोरी भाग 2 -टाइगर ट्रैकर्स

प्रत्येकाचे चेहरे बघन्यासारखे झाले होते.त्यांच्यात स्फूर्ती आणण्याची गरज होती. आमच्याजवळील माइक सिस्टीम बाहेर काढली आणि शिवछत्रपतींच्या आणि आई भवानीच्या जयघोषाने अवघे जंगल दुमदुमुन गेले.फक्त 6 जणांचा आवाज पण ऐकणाऱ्याला वाटाव कि 50000 हजाराची फौज गडावर चाल करुन येत आहे.मित्रांमध्ये स्फूर्ती आली आणि पुन्हा नव्या दम्याने आणि जोशाने रतनगड जवळ करू लागलो.बरोबर तीन तासाने आमच पहिल टार्गेट पहिली शिडी गाठली.रतनगडच्या या शिड्या उभ्या कड्याला भिडलेल्या आहेत.आणि काळाने खुप गंजलेल्या अवस्थेत आहेत.नजर वर करुन पहिल तरी दरदरून घाम सुटावा.एकावेळी एकच माणूस शिडीवरुन जाऊ शकतो.या शिडीवरुन तोल गेलाच तर मृत्युला खुल आमंत्रण दिल्यासारखे आहे.शिवछत्रपतींचा जयघोष आसमंतात दुमदुमत होता.या शिड्या अंदाजे 4000 किंवा त्यापेक्षा अधिक उंचीवर आहेत.वरुन खाली बघितल आणि आम्हाला कल्पना आली कि आम्ही किती मोठ शिखर सर केले आहे.अशा 6 आडव्या -उभ्या शिड्या पार केल्यावर दरवाजा लागतो.दरवाजा आजही उत्तम स्तिथीमध्ये आहे.दरवाज्यावरील शिल्पकामही अप्रतिम आहे.दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हाताला एक प्रचंड कडा लागतो. जायला एक निमुळती वाट आहे आता शासनाने तेथे तटबंदी उभारली आहे.ईथे दोन गुहा आहेत 1) रत्नादेवीची गुहा 2)अंधारी गुहा रत्नादेवीच्या गुहेमध्ये 6 जणांचा ग्रुप आरामात राहु शकतो.तर मोठ्या गुहेमध्ये 20 ते 25 जण आरामात राहु शकतात.रत्नादेवीची गुहा ही आतून अतिशय उबदार ,स्वच्छ प्रकाशाची आणि सुरक्षित आहे.सकाळी लवकर गेल्यामुळे आम्हाला रत्नादेवीची गुहा रहायला मिळाली.गुहेमध्ये रत्नादेवीची अतिशय प्राचीन मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची सुद्धा प्राचीन मूर्ती आहे.रत्नादेवीची आम्ही सर्वानी विधिवत पूजा केली.आता आपल्याला कळले असेल की रत्नादेवीच्या नावावरूनच गडाला रतनगड असे नाव पडले. गडावर पोहोचल्यावर आम्ही एनर्जीसाठी लिंबु सरबताचा बेत आखला होता पण रतनवाडीला लिंबु मिळालच नाही साखर तेवढी बरोबर होती.साखरेचे गोड पाणी आम्ही प्यायलो.पण ते गोड पाणी प्रचंड थंडगार आणि मधुर लागत होत.गडावर थंडगार पाण्याची दोन तळी आहेत आणि त्यामध्ये मुबलक पाणी बारमाही असते.त्याबरोबरच भेळ बनवली होती.थोडस पोटात गेल्यामुळे बर वाटत होते.विश्रांती केल्यानंतर आम्ही गड फिरण्यासाठी बाहेर पडलो.फोटोग्राफी साठी जनुकाही रतनगडावरील आकाशाला गवसणी घालणारी उंचच उंच शिखरे आम्हाला साद घालत होती.रत्नादेवीच्या गुहेच्या समोर डाव्या हाताला आकाशाला भिडलेला एक प्रचंड सुळका दिसतो तेथील गावकरी यांच्या मते त्या सुळक्यावर शिवपिंडी आहे व तिथून सतत पाण्याची धार चालु असते.कावेरी नदीच उगमस्थान तेथे आहे याबद्दल गावकर्यांच्या मनात संभ्रम आहे. रतनगडावरील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे.आयुष्यात इतकी शांतता प्रथमच अनुभवत होतो.मन अगदी निरभ्र होऊन गेले होते.तेव्हाच मनाशी ठरवले की आयुष्यात पुन्हा कधीतरी नक्कीच या ठिकाणी येईन.

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

रतनगड ट्रैक स्टोरी -टाइगर ट्रैकर्स

22 nov 2013 हा दिवस माझ्या आयुष्यातला एक यादगार दिवस म्हणता येईल .रतनगड ट्रैकच्या निमित्ताने एक अतिशय दुर्गम असा ट्रैक आम्ही पार पाडला .टाइगर ट्रेकर्सचे ग्रुप लीडर वैभव भालेकर आणि इतर सभासद त्यामध्ये संतोष भाताडे,सचिन भातरे ,नितेश पांचाळ ,चेतन टेंकाळे आणि मी. अवघे 6 जण .परंतु दुर्दैम्य इच्छाशक्ती ,धाडस 'आणि चिकाटी या जोरावरती हा ट्रैक पार करणाऱ्या या माझ्या मित्रांना सलाम करतो. आणि या ट्रेकच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करण्याचा हा छोटासा प्रयत्न ........ अंधेरीमध्ये (सीप्ज) साई संघवी स्टार प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे.आता ती बंद आहे पण आजही साईबाबांच मंदिर तेथे आहे.या कंपनीमध्ये आम्ही त्यावेळी कामावर होतो.ग्रुपमधील सर्वजण कोकणाकडचे असल्याने आमची एकमेकांशी छान मैत्री झाली होती.आणि अशातच आमचं पिकनिकनला जायचे ठरले.रतनगडला भाऊ वैभव जावून आलेला असल्यामुळे त्याला तिकडची सर्व माहिती होती.तोही आमच्याबरोबर कामाला होता.त्यामुळे बेसिक प्लानपासून अगदी फाइनल प्लॅनिंग सर्व त्याने केल होत.म्हणजेच गाडीच वेळापत्रक ,मॅप,कालावधी वैगरे सर्वकाही..... अगदी मिनिटांचा हिशोब काढला होता.अर्थात त्याला बेस्ट प्लानरचा किताब दिला पाहिजे असा मानुस. 22 nov 2013 तारीखला शुक्रवारी संध्याकाळी आम्ही सर्वजण c.s.t स्टेशनला एकत्र जमलो.कारण आम्हाला रात्रीची महानगरी एक्सप्रेस पकडायची होती.या एक्सप्रेसला दोनच जनरल डबे असतात.आम्हाला मस्तपैकी बसायला जागा मिळाली आणि अशारीतिने आमच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.इगतपुरी स्टेशनला आम्हाला उतरायच होत.ईगतपुरीहुन आम्हाला शेंडी गावाला जाणारी बस पकडायची होती.इगतपुरी बसस्टैंडलाच आम्ही रात्र काढली आणि सकाळी 6.30 पहिली बस पकडून शेंडीला निघालो.अफाट थंडी पडली होती.बसचा मार्ग अतिशय खडतर होता आणि रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते.बरोबर 7 वाजता आम्ही शेंडी गावच्या फाटयावर उतरलो.कारण तिथून आम्हाला रतनवाडी गडाचा पायथा जवळ करायचा होता.रतनवाडीतून रतनगडला जायचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे भंडारदरा डॅम 9 किमी होडिने किंवा रस्त्याने ट्रॅव्हल्स गाडीद्वारे शेंडी गावात उतरल्यावर पाच मिनिटे सरळ पुढे चालत गेल्यावर भंडारदरा डॅम हे इंग्रजकालीन मोठे धरण आहे.या भागाला पिकनिक पॉइंट असे म्हणतात .ईथे आम्ही फोटोग्राफीची हौस भागवुन घेतली.बोट फेरींची सोय नसल्यामुळे आम्ही ट्रॅव्हल्स गाडी बुक केली.दोन वेळेच्या येन्याजाण्यासाठी गाडी असणार होती.आणि अशारीतिने ट्रॅव्हल्स गाडीद्वारे आम्ही निघालो अतिशय खाचखळग्याचा रस्ता आहे.प्रवासामध्ये रंगत भरण्यासाठी आम्ही आमच्या बरोबर आणलेली ढोलकी काढली आणि आमच्या भजनाला सुरुवात झाली.माझा भाऊ वैभव हा उत्कृष्ट ढोलकीपटु असल्यामुळे कार्यक्रममध्ये अतिशय रंगत आली. 1.30 तासाच्या प्रवासानंतर आम्ही रतनवाडीला पोचलो.इथेच अमृतेश्वर देवस्थान आहे.अतिशय पुरातन असे मंदिर आहे अंदाजे 700-800 वर्ष पुरातन असावे.आम्ही मंदिरात पोचलो त्यावेळी मंदिराच्या गाभार्यामध्ये पाणी होते.शिवपिंडी पूर्ण पाण्यात होती. दरवाज्यासमोरचा काळ्या पाषाणातील नंदी आपल स्वागत करतो.अमृतेश्वर मंदिराजवळील प्राचीन तळे अतिशय मनोहर आहे.अमृतेश्वर देवाची पूजा करुन आम्ही मोहिमेला सुरुवात केली. आमचे सुदैव असे कि गावातील काही मंडळी गडावर पर्यटकांची व्यवस्था करण्यासाठी चालली होती त्यामुळे आम्हाला वाटाड्याची गरजच उरली नाही.सरळ रस्ता संपून जंगल चालू झाले होते.सह्याद्रीचच जंगल ते निबिड घनदाट .हिंस्त्र श्वापदांची तेथे काहीच कमी न्हवती.जंगलामध्ये खुप फसव्या वाटा आहेत त्यामुळे पुरेशी माहिती असल्यशिवाय जाने धोक्याचे आहे.पर्याच्या काठाकाठाने वाट जाते.आणि येथील निसर्गसौंदर्य तर अवर्णनीय सोबतच्या मंडळीला गडावर जाण्यासाठी घाई असल्यामुळे त्यांच्याकडून वाटेची पुरेशी माहिती घेतली.चालता चालता सूर्य डोक्यावर कधी आला ते कळलेच नाही .उभ्या चढनीमुळे सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा वाहु लागल्या होत्या.वाटेच्या जवळच मोठा पर्या वाहत होता आणि आमची अंघोळही झाली न्हवती.मग काय एक छानशी जागा अंघोळीसाठी निवडली. पाण्यात पाय घातला आणि काय अंगावर काटा आला .बर्फापेक्षा थंडगार पाणी आणि तेही भरदुपारी 12 वाजता आयुष्यात पहिल्यांदा पाहत असेन.पाण्यामध्ये यथेच्छ अंघोळीवर ताव मारला .आणि आम्ही मार्गक्रमित झालो.सह्याद्रीची सफर फक्त तिघेच करू शकतात .1)वारा2)वाघ3)मराठे.... या वाक्याची जर प्रचिती घ्यावयाची असेल ना तर ईथे यावे.रतनगडचे प्रस्तररोहण उभ्या चढनीचे आहे.दर एक तासाने विश्रांती घ्यावी लागत होती.बरोबर आणलेल्या काकडी ,गाजर यांचा एव्हाना फन्ना पडला होता.अगदी पेपरमिटची एक गोळीसुद्धा वाचली नाही.एक डोंगर संपला की आता गड येईल अशी आशा वाटत होती पण गड काही नजरेत येत न्हवता.माझे सर्व मित्र काकुळतिला आले होते.