दसरा मेळावा 2016 शिवतीर्थ
दसरा मेळावा 2017 शिवतीर्थ
माझ्या या ब्लॉग मधे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे .मी एक पक्का मराठी माणूस आहे त्यामुळे साहजिकच मराठी माणसाबद्दल माझ्या मनात असीम आत्मीयता आहे.मला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे .आणि आतापर्यंत काही मोठे ट्रैक सुदधा केले आहेत. सह्याद्री आणि मी घनिष्ठ मित्र आहोत असे मला वाटते.माझे आदर्श,माझे दैवत छत्रपती शिवराय यांचे कार्य पुढील पिढीसमोर ठेवणे हे माझे प्रथम काम आहे .या ब्लॉगमधे सह्याद्री,गडकिल्ले कोकण,माझे ट्रेकिंगचे अनुभव,मराठी माणूस यांवर प्रामुख्याने बोलणार आहे.
*समाजामध्ये LEADERSHIP दोन प्रकारच्या असतात.*
१) Image Based Leadership
२) Knowledge Based Leadership
*1)Image based leadership*
ही आपल्याला सर्वच ठिकाणी बघायला मिळते. अशा leadership कडे गाडी असते, बंगला असतो आणि चमच्यांचा लवाजमा असतो. असे leader डोळ्यावर गॉगल लावतात आणि काळी काच लाऊन पांढ-या शुभ्र गाडीतून फिरतात. त्यांच्यामागे त्यांचे चमचे, दलाल
हुजरेगिरी करतात. विकासाच्या नावाखाली अशी leadership समाजात पैशाच्या
जोरावर image तयार करतात. परंतू ही Image केवळ एका
कुरकुरेच्या पाकीटासारखी असते. ज्यात 90% हवा असते. अशा
लिडरशीप पासून समाजाचे कधीही पोट भरत नाही. तेप समाजात कधी फिरकत नाही ते समाजाला कोणतेच हक्क अधिकार मिळवून देऊ शकत नाही, कारण त्यांचा विश्वास चमकधमकवर जास्त असल्याने दुस-यांसाठी लढत नाही !
*2) Knowledge Based Leadership*
आपण बघतोच की ही कुठलाही दिखावा करत नाही. समाजात मान-सन्मान मिळावा म्हणून खोटे आश्वासने देत नाही. त्याचं उद्दिष्ट केवळ आणि केवळ आपल्या समाजाच्या हितासाठी कार्यरत राहणे, त्यांच्या हक्काप्रती जागरुक राहून त्यांना समाजातील घटकाला न्याय मिळवून देणे, समाजात प्रबोधनात्मक चळवळ
निर्माण करणे असे असते. अशी लिडरशीप आपणास हजारात एक
व्यक्ति पाहण्यास मिळते पण अशा लीडरशिप ला समाजातील अनेक लोकांचा विरोध सहन करावा लागतो
मात्र ही लीडरशिप तावुन सुलाखूंन निघते .या लीडर शिपला आयुष्यत यश मिळातेच व ते लोकांच्या मनावर शेकडो वर्ष राज्य करतात समाजातील मोठ्या परिवर्तनाचा पाया ते रचत असतात.
*म्हणून समाजातील सर्व प्रकारच्या लोकांनी या दोन लिडरशीप मधील फरक ओळखून आपला लिडर कोण हे ठरवावे.*
समाजाने वरवर न बघता त्यातील गोष्टींकडे बघायला पाहिजे.
*असे नेतृत्व करणार्याच्या खंबीरपणे पाठीशी उभे रहा,आपला विकास दूर नाही.*
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी आपल्या भारत देशाचा 71 वा स्वातंत्र्य दिन. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे. सर्वाँना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा......
किरण भालेकर
Bhalekar117.blogspot.com
*बेशिस्त पर्यटन!!*
परवा परत दोघे युवक आंबोलीत दरीत पडून मेले. नेहमीप्रमाणें आमचा बाबल आल्मेडा, एडव्हेंचर संस्थांचे स्वयंसेवक त्यांचे मृतदेह शोधण्यासाठी जीव धोक्यात घालून दरीत उतरलेत. रात्रभर शोध मोहिमेत आहेत. अधिकारी मोहिमेच्या वेळी हॉटेलमध्ये मजा करताहेत, म्हणून सगळ्यांची टीकेची झोड उठतेय.
पण, कालच्या घटनेचा जो व्हिडीओ व्हायरल झाला, तो पाहता खरंच वाटतं, या हलकट लोकांसाठी रात्रभर पावसात, धुक्यात, कडाक्याच्या थंडीत या सगळ्यांनी आपला जीव धोक्यात घालायची काय गरज आहे? ट्रेकिंग करताना एखादा ट्रेकर चुकून पडला,तर त्याला निदान कर्तव्यभावनेची बाजू तरी उदात्त असली असती.
हे वाचताना असंवेदनशील वाटेल, पण हेच कठोर सत्य आहे. हे मेलेत यांच्या कर्मामुळे, पण ह्यांचे मृतदेह आणायला आमचे जे स्वयंसेवक दरीखोऱ्यात उतरून जिवावरची थरारक जोखीम उठवतात, त्यांच्यापैकी एखाद्याच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर यांच्या कुटुंबियांना कसल्या भविष्याचे संरक्षक कवच आहे हो? यांची माणुसकी काय भावाने विकली जाईल या दुनियदारीत?
हि मंडळी कशा प्रकारे जीव धोक्यात घालतात, यावर यापूर्वीच सिंधुदुर्ग ऍडव्हेन्चर डॉ कमलेश चव्हाण आणि अभिजित चव्हाण यांच्या आंबोलीतल्या शोधमोहिमेतल्या थरारावर तरुण भारतच्या श्री शेखर सामंत यांनी प्रकाश टाकलेला होता. असे अनेक जिवावरचे थरार अशी अनेक स्वयंसेवी वृत्तीची मंडळी सतत घेत आहेत. कालही, या मृतदेहांच्या शोधासाठी स्थानिकांसोबत कोल्हापूर, सांगली टीमचे सदस्य सहा हजार फूट खोल दरीत उतरलेत. दाट धुके, मुसळधार पाऊस आणि श्वापदेसमृध्द जंगलमय भाग यात त्यांनी कालची रात्र जंगलातच कशी घालवली असेल, ते देवालाच ठाऊक.
अलीकडे निसर्गसुंदर आंबोलीत अपघात आणि हाणामाऱ्याचे प्रमाण खूप वाढलंय. अंगावरच्या कपड्याचीही शुद्ध नसलेल्या आणि निसर्ग-पर्यटन नव्हे, तर *झिंगाट* पर्यटन करायला आलेल्या या बहुतांशी बाहेरच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील बेपर्वा तरुणांमुळे सिंधुदुर्गचे पर्यटन बदनाम होते आहे, याची आपल्यालाच दखल घ्यायला हवी. कौटुंबिक पर्यटकांची तर आंबोलीला जाऊन मजा करायची हिंमतच नाही.
दुर्दैव, म्हणजे प्रत्येक अपघातानंतर पोलीस दल आणि मुख्यत्वे *आपत्ती व्यवस्थापन* यावर टीकेची झोड उठवली जाते. सिंधुदुर्ग आपत्ती व्यवस्थापनात अनेक घसघशीत त्रुटी आहेतच, पण अगदी परिपूर्ण असले असते, तरी या असल्या नादान पर्यटकांसमोर काय कपाळ बडवणार होते?
सुरक्षा.. सुरक्षा म्हणजे नेमकं काय करायचं हो? काय असल्या प्रत्येक पर्यटकाबरोबर एक पोलीस लावायचा? आज हे कावळेसादवर xx मस्ती करून मेले, उद्या नांगरतास वर करतील. अख्ख्या सह्याद्रीच्या कडेकपारीवर पोलीस दल आणि आपत्ती व्यवस्थापन दल पेरायचे का? पर्यटकांची काहीच जबाबदारी नाही का?
दुसरी गोष्ट, जर अशा शासकीय यंत्रणांवर बोट दाखवून बोंबलायचेच असेल, तर स्टेट एक्सइजच्या नावाने का बोंबलत नाही?
एखाद्या हॉटेलमध्ये कोणाकडे रिकामी बाटली मिळाली, तरी त्यातले थेंब हुंगुन हॉटेल मालकावर कारवाईचा बडगा उगारणारे हे *दक्ष* खाते सिंधुदुर्गात रात्रंदिवस उघड्या माळरानांवर चालणाऱ्या दारुपार्ट्यांवर कारवाई का करत नाही? भर रस्त्यावर दारूच्या बाटल्या हातात घेऊन नंगानाच करणाऱ्या या झिंगाट कार्ट्यांवर कठोर कारवाई का नाही होऊ शकत? अर्थात, कठोर कारवाई म्हणतोय मी, तोडपाणी नाही!
असल्या नादान आणि हरामखोर पर्यटकांमुळे संपूर्ण आंबोली बदनाम होत आहे. पर्यटन बदनाम होत आहे. बिचारे बाबल आल्मेडा आणि सगळे सहकारी सगळ्या सिस्टीमला भलेही शिव्या घालतात, नाराज होतात, उद्विग्न होतात, पण संकटाच्या वेळी सगळं बाजूला ठेऊन तिथे धावून जातात आणि आपला जीव धोक्यात घालतात. फक्त माणुसकीच्या दृष्टीने!! दरीत रात्र रात्र फिरतात, जंगली श्वापदांचाही धोका पत्करतात.
प्रश्न पडतो, कोणासाठी? या असल्या मरायचीच लायकी असलेल्या झिंगाट पर्यटकांसाठी, कि आपत्ती व्यावस्थापनाच्या इज्जतीसाठी? यांच्या असीम माणुसकीची थोडीतरी किंमत राखावी !!
शिवाजी राजे आणि बहिर्जी नाईक यांच्या विचारावर उभी आहे इस्राईल गुप्तहेर संघटना 'मोसाद
*"महाराष्ट्राची हेरगिरी..!!!"*
जगातील दुस-या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय म्हणजे 'हेरगिरी'
जवळपास सर्वच देशांकडे आज त्यांच्या गुप्तचर संघटना अथवा संस्था आहेत आणि त्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात.
गुप्तचर अथवा हेर हे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आर्य चाणक्यांच्या 'अर्थशास्त्र' मध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो. याबाबत विस्तृत विवेचन चाणक्यांनी करून ठेवलेले आहे.
*छत्रपती शिवाजी महाराजांचा 'गनिमी कावा' यशस्वी होण्यामागे 'बहिर्जी नाईक' यांच्यासारख्या हुशार-चलाख हेरांचा सहभाग मोठा आहे.*
अमेरिका, रशिया आणि इस्राईल या देशांच्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तचर संस्थांचा जगभरात विशेष दबदबा आहे.
'बाजीराव जाधव' महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे, वयाच्या सोळाव्या वर्षीच भारतीय सैन्यदलात नोकरी स्वीकारून देशसेवेचे अखंड व्रत अव्याहतपणे जपणारे. सन १९९९ च्या कारगिलच्या लढाईत आपल्या सार्थ पराक्रमामुळे भारत सरकारने त्यांना 'शौर्य पदक' देऊन वरिष्ठ पदावर नेमणूक केलेली.
चौकस बुद्धी, विशेष धाडस, शौर्य यांच्या जीवावर बाजीराव हिंदुस्थानी गुप्तहेर खाते "रॉ" (RAW) मध्ये रुजू झाले.
"रॉ" : RAW-Reasearch & Analysis Wing, हिंदुस्थानी गुप्तहेर संघटना, ज्याची स्थापना, सन १९६२ (भारत-चीन) आणि सन १९६५ (भारत-पाकिस्थान) च्या युद्धा नंतर सैन्याची कामगिरी आणखी प्रबळ करण्याकरिता 'श्री. रामेश्वरनाथ काव' यांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर, १९६८ मध्ये करण्यात आली. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळ-जवळ २० वर्षांनंतर..!
अमेरिकेत.., 'जागतिक सुरक्षा परिषद' संपवून बाजीराव गाडीमधून विमानतळाकडे रवाना होत असताना, एका सुंदर परदेशी मुलीने त्यांना थांबविले.
तिला समोर पहाताच बाजीराव आनंदित झाले...,
बाजीरावांनी स्मित वदनाने त्यांना अभिवादन केले.
'नमस्ते..!
.....*जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर खात्याची उच्च अधिकारी 'साराह' बाजीरावांसमोर मोठया प्रसन्न चेह-याने दोन्ही हात जोडून उभी होती...!*
बाजीरावांचा तो भारतीय स्नेह स्वीकारत ती उत्तरली..
'नमस्ते..!!
'अरे, मी इथे गुप्तहेर म्हणून नव्हे तर माझ्या देशाची प्रतिनिधी म्हणून आले आहे. तुला पाहिले आणि राहवले नाही.. आणि तुला भेटायला आले.'
साराह आणि बाजीराव हे काही वर्षांपूर्वी इस्राईल येथे भेटले होते.
*साराह ही इस्राईल गुप्तहेर संघटना 'मोसाद' ची एक तरुण, तडफदार आणि तितकीच निडर अधिकारी आहे.*
*'मोसाद'... एक अशी गुप्तहेर संघटना, जिच्या हिटलिस्टवर जर एखाद्याचे नाव चढले तर प्रत्यक्ष देवसुद्धा त्याला वाचवू शकत नाही, असा दरारा...!!*
इस्राईल सारख्या तुटपुंज्या देशाची ही छोटीशी संघटना असामान्य कर्तृत्व, जगातील सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट गुप्तहेर संघटना कोणती, तर डोळे झाकून उत्तर येते 'मोसाद'.
'मोसाद' चा अर्थ साक्षात मृत्यू...! आपल्या देशाच्या शत्रूला शोधून, त्याला आपल्या देशात गुप्तपणे आणून त्याला शिक्षा देते. शिक्षा दिल्यानंतर सर्व जगाला कळते, की अमुक-अमुक व्यक्तीला शिक्षा दिली गेली. इतकी खतरनाक संघटना.
मोसादचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 'कमालीची गुप्तता', याच गुप्ततेमुळे मोसादमध्ये दुस-या कुठल्याही गुप्तचर संघटनेला आपला हेर घुसवणं जमलेलं नाही, पण याच मोसादनं जगातील सर्वच गुप्तचर संघटनेमध्ये आपले हस्तक घुसवलेले आहेत. त्यामागचा हेतू एकच-माहिती मिळवणं.
*अशा गुप्तहेर संघटनेत दहा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी बाजीराव इस्राईलला गेले होते, तेंव्हा सारहाची भेट झाली होती. तिच्याकडून खूप काही शिकून घेतले होते.*
आज इतक्या वर्षांनंतर सारहाने बाजीरावांना ओळखले.
विमानाला अजून २/३ तास अवकाश होता म्हणून दोघेही कॉफीशॉप मध्ये बोलत बसले.
'सारहा, तू इतक्या वर्षांनंतरही मला अचूक कसे काय ओळखलेस..?'
मला वाटले, ज्यांना सारे जग घाबरते अशा संघटनेची एक वरिष्ठ अधिकारी स्वतःच्याच अभिमानात(तो-यात) असेल; पण तू तर मला अजूनही लक्षात ठेवलेस..! It's really surprising...!!
किंचित स्मित हास्य करीत सारहा म्हणाली,
'अरे, असे नको बोलूस.., *आम्ही जगात सर्वांना विसरू, पण भारतीय लोकांना कधीच नाही.*
एक परदेशी मुलगी, आणि ती ही एका महाभयंकर अशा गुप्तहेर खात्याची अधिकारी...!! आपल्या भारताबद्दल तिच्या प्रति असलेले प्रेम-आस्था पाहून डोळे भरून आले.
सारहा पुढे बोलत होती;
'अरे, हे काहीच नाही. जरी आम्ही जगात सर्व श्रेष्ठ असलो तरी आमच्या गुप्तहेर खात्याचा आत्मा-शिकवण ही मूळची भारताचीच आहे, *आम्हाला तुमचा इतिहास, तुझ्या महाराष्ट्राचा इतिहास अगदी कोळून शिकवला जातो.
*आम्हाला शिवाजी राजे शिकवले जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या गुप्तहेर प्रणालीचा आत्मा आहे... बहिर्जी नाईक...!*
'बहिर्जी नाईक', नाव ऐकताच बाजीरावांच्या डोक्यात झिणझिण्या आल्या, अंगावरून सरसरून काटा आला.... डोळ्यांत अश्रू आपसूक तरळले.
बाजींकडे पहात सारहा म्हणाली,
'तुझ्या डोळ्यांत पाणी..? माझं काही चुकलं का...?'
नकारार्थी मान हलवत बाजीरावांनी डोळे पुसले आणि बोलू लागले,
*'नाही सारहा, तू ज्यांचे नाव घेतलेस त्या बहिर्जी नाईकांना, त्यांच्याच महाराष्ट्रात लहानाचा मोठा झालो तरी समजू शकलो नाही, मीच नाही माझ्या सारखे कित्येक आहेत ज्यांना बहिर्जी नाईक सोड पण आमचे राजे 'छत्रपती शिवाजी महाराजही' नीटसे माहिती नाहीत.*
आज त्यांचे नाव तुझ्या सारख्या विद्वान-निडर मुलीच्या तोंडून ऐकून मी पुरता खजील झालो आहे.
बाजीरावांचे ते बोलणे ऐकताच सारहा म्हणाली;
'अरे, तुम्ही खूप भाग्यवान आहात, आमची काम करण्याची पद्धत तुमच्या शिवाजी राजांसारखी अन् बहिर्जी नाईकांसारखीच आहे. आमच्या हर एक अधिका-यांच्या तोंडी तुमच्या शिवाजी राजांचा आणि बहिर्जी नाईकांचा सर्व इतिहास तोंडपाठ आहे, आणि तो आम्हाला ठेवावाच लागतो, तसेच आम्हाला शिकवले जाते. आमची training च तशी आहे.
सारहा बोलत होती आणि बाजीराव ऐकत होते.
बाजीराव सारहाचा निरोप घेऊन विमानात बसले, प्रवासात.., डोक्यात फक्त अन् फक्त एकच विचार..,शिवाजी राजे आणि बहिर्जी नाईक.
'किती मूर्ख आहोत आपण भारतीय, सा-या जगाला घाबरून सोडणारी 'मोसाद' ही मराठयांचा दैदीप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्ताचे मराठे आज तुटपुंज्या देशाचा दहशतवाद गेली पन्नास वर्षे निमूटपणे सहन करतोय, आजही आमचे जवान हकनाक बळी जातायेत. बाजीरावांच्या डोक्यात विचारांचा डोंब उसळला होता.
आता त्यांना एकच ध्यास लागला होता शिवाजी राजांचा - या महाराष्ट्राचा बहिर्जी नाईक समजून घेण्याचा.