सोमवार, ६ मार्च, २०१७

वीरगळ

असे दगड कोरण्याची पद्धत मूळ कर्नाटक / आंध्रप्रदेशातून आली असावी असे अभ्यासकांचे मत आहे.

याला वीरगळ असे म्हणतात वीर म्हणजे जो लढाई करतो अथवा आपल्या लोकांचे संरक्षण करतो अशी व्यक्ती आणि गळ म्हणजे दगड. असे दोन शब्द मिळून वीरगळ हा शब्द तयार झाला.

एखाद्या व्यक्तीला  लढाई करताना अथवा गावाची रक्षा करताना अथवा गुरांचे संरक्षण करताना वीरमरण आले तर त्याची आठवण म्हणून कोरलेला दगड होय. विरगळ हि मुख्यतः ४ भागात विभागलेली असते.

१ :- सूर्य आणि चंद्र - वीरगळीच्या सर्वात वरच्या भागात एका बाजूला सूर्य आणि दुसऱ्या बाजूला चंद्र कोरलेले असते, याचा अर्थ या वीराची कीर्ती सूर्य - चंद्र असे पर्यंत राहील.

२ :- शिवपिंड व नंदीची पूजा - याचे संशोधक दोन अर्थ सांगतात  (i)  वीरमरण आलेली व्यक्ती कैलासात जाऊन शंकराची आराधना करत आहे. ( ii ) वीरमरण आलेली व्यक्ती हि शैव पंथाची होती.

३ :- लढाई - या भागामध्ये वीर लढाई करताना दाखवलेले असते. यात मुख्यत्वे वीर लढाई करताना दाखवले असते तसेच  कोणाशी लढत होता त्याचे शस्त्र कोणते होते हे दाखवलेले असते. बऱ्याच वीरगळींमधे या भागात वेगळेपण आढळतो वीराच्या हातात काही ठिकाणी भाला , तलवार . धनुष्य-बाण तर काही ठिकाणी वीर घोड्यावर बसलेला दाखवण्यात आला आहे.

काही ठिकाणच्या वीरगळींमधे बैलाची चिन्हे कोरलेली आहेत याचा अर्थ हा वीर गावातील गुरांचे रक्षण करताना धारातीर्थी पडली आसा होतो

४ :- वीरमरण - या भागामध्ये वीर हा धारातीर्थी पडलेला दाखवलेला असतो.

राज बलशेटवार मावळ तालुका
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा