माझ्या या ब्लॉग मधे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे .मी एक पक्का मराठी माणूस आहे त्यामुळे साहजिकच मराठी माणसाबद्दल माझ्या मनात असीम आत्मीयता आहे.मला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे .आणि आतापर्यंत काही मोठे ट्रैक सुदधा केले आहेत. सह्याद्री आणि मी घनिष्ठ मित्र आहोत असे मला वाटते.माझे आदर्श,माझे दैवत छत्रपती शिवराय यांचे कार्य पुढील पिढीसमोर ठेवणे हे माझे प्रथम काम आहे .या ब्लॉगमधे सह्याद्री,गडकिल्ले कोकण,माझे ट्रेकिंगचे अनुभव,मराठी माणूस यांवर प्रामुख्याने बोलणार आहे.
शुक्रवार, १० एप्रिल, २०१५
गोळवशी -माझं गाव
लांजा तालुक्यात साटवली रोडला वसलेले माझ गोळवशी गांव .माझ्या या जन्मभूमिबद्दल थोडस काय आहे ना आज गावची आठवण येत आहे आणि मनाच्या कोपर्यात साठवून ठेवलेल्या आठवणींचा कप्पा अलगद उफाळून वरती येऊ पहात आहे आणि त्याला बंद करणे माझ्याच्याने तरी शकय नाही .या आठवणींची पण वेगळीच गम्मत आहे.काही आठवणी रडता रडता हसवायला लावणाऱ्या तर काही हसता हसता डोळ्यात अश्रु आणणारया,काही अबोल तर काही अविस्मरणीय .गावच्या आठवणीबद्दल माज हेच मत आहे या आठवणी कधींही न विसरता येणाऱ्या -अनमोल याबद्दल प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात.परंतु आमच्यासारख्या गांव सोडून कामधंद्यानिमीत्त मुंबईत स्थायिक ज़ालेल्या लोकांच्या गावच्या आठवणी काहिशा भावुक असतात.
गोळवशी गांव महाराष्ट्राला नविन नाही.गावची ग्रामदेवता आई नागादेवीची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे.महाराष्ट्राच्या कनाकोपर्यातून भक्तगण आई नागादेवीच्या दर्शनाला येत असतात.आमच्या गावचा बायंगी देव खुप प्रसिद्ध आहे.त्यामुळे कोणी मस्करीमध्ये विचारल की तू कुठला रे ?त्यावर मी म्हणतो लांज्याचा.मग समोरचा परत बोलतो लांज्यात कुठे ?त्यावर मी म्हणतो गोळवशी.
पुढचा माणूस अतिशय अदबीने बोलायला लागतो.ज्यांना आमच्या गावची महती माहित आहे ते आमच्या वाट्याला जात नाहीत.याचे कैक अनुभव आहेत.माझे आजोबा असे सांगायचे कि पूर्वी आमच्या गावातील आंबा,काजु जमिनीवर जरी पडलेले असले तरी ते उचलण्याची हिंमत आजुबाजूच्या गावातील लोक करत नसत.इतके सगळे वचकुन असत.आणि आजही 2015 साली परिस्तिथी काही वेगळी नाही.
तुम्हाला म्हणून सांगतो मित्रहो आम्ही क्रिकेट स्पर्धांसाठी पंचक्रोशी,तालुक्यामध्ये खेळायला जातो.आमच्या संघाच नाव आहे नागादेवी गोळवशी.समोरच्या टिमच्या तुलनेत आमच्याकडे सगळे लींबु-टिंबूचा भरणा असतो.समोरची टीम अगदी जिंकायला आलेली असते .अचानक सामन्याचा रंग पालटतो प्रतिस्पर्धी टिमच्या हातातोंडाशी असलेला घास आम्ही हिरावुन घेतो.समोरचे बिच्चारे अक्षरशः
रडत मैदान सोडतात .जाता जाता म्हणतात कि बायंगी उठवलानी वाटत .हसून हसून पोट दुखायची वेळ येते.म्हणतात ना ते नावात काय आहे?नावात बरंच काही आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला हा गांव.राजापुरला जाताना शिवाजी महाराज गावातुन नदीपार करुन गेले.आणि इंग्रजांची वखार लुटली.गावाच्या सिमेवरून मुचकुंदी नदी वाहते.विशाळगडाच्या पायथ्याला नदिचा उगम होतो.नदिला बारमाही पाणी असते.नदी पुढे पूर्णगडच्या खाडीला मिळते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
लांजा तालुक्यात साटवली रोडला वसलेले माझ गोळवशी गांव .माझ्या या जन्मभूमिबद्दल थोडस काय आहे ना आज गावची आठवण येत आहे आणि मनाच्या कोपर्यात साठ...
-
स्वराज्य समुद्रावर वाढत असताना जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापा...
-
Hey..., Trekkers & Nature Lovers .. Safar Sahyadri Trekkers organise a trek to Kalsubai_Highest Peak of Maharashtra on 23,24 Jun 2018...
दादा बायंगी भुत व त्याविषयी प्रचलित माहिती हे खरे आहे का ?
उत्तर द्याहटवा