बुधवार, ६ मार्च, २०१९

किल्ले साटवली-लांजा राजापूर


स्वराज्य समुद्रावर वाढत असताना जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी ठाणे म्हणून उदयास आलेले लांजा मार्गे लागणारे साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढी आहे .







छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणात मोहीम आखली त्या वेळी राजापूर ताब्यात घेऊन त्यांनी व्यापाराच्या दृष्टीने भरभराटीस आलेली लांजा तालुक्यातील साटवली गढी ताब्यात घेण्यासाठी एक सुभेदार सैन्यासह पाठवला. मराठी सैन्य गढी ताब्यात घेण्यासाठी येत असल्याचे कळताच मोगल सुभेदार आपल्या सैन्यासह जीव वाचवण्यासाठी महंमद वाडीच्या डोंगरावरून गुहेत लपून बसला. तो ज्या वाडीतून पळाला त्या वाडीला महंमदवाडी असे आज संबोधले जाते.

समुद्रा वरून नदीत पण उतरून हे इंग्रज एक दिवस जमिनीवर येऊन आपलं राज्य स्थापन करतील हे ठाऊक होतं महाराजांना .  मुचकुंदी नदी वर नियंत्रण ठेवून आपला व्यापार कोकणात होत असताना राजा साटवली गढी ची मदत घेऊन त्यात युद्धसामग्री व जीवनावश्यक वस्तू राखून ठेवून परकीय सत्ते बरोबर लढतो ह्यावरून मराठ्यांची समुद्री सत्ता किती बळकट असेल ह्याचा अंदाजा येतो .

बुरुज -

दुर्ग बांधणीत पहिले महत्वाचे अवयव म्हणजे भक्कम बुरुज . तटाला कमी जास्त अंतरावर आवश्यकते नुसार बुरुज बांधला जातो . तटाला लागूनच असणारी काही जागा तटाच्या जंग्यामधून होणाऱ्या माऱ्याच्या टप्यात येत नसे . ही जागाही माऱ्यात यावी म्हणून , तटापासून थोडे पुढे येतील अशा पद्धतीने बुरुज बांधला की त्यावर तोफांची सोय झाली तर लढाई जिंकताना तो बुरुज लढाईत सर्वात जास्त महत्वाचा ठरतो .








इतिहास:

साटवली किल्ल्यावरचा रस्ता जो लागतो त्याला लागून एक विठ्ठल रखुमाईचं पुरातन मंदिर आहे जे कुठल्या तरी सुरत च्या व्यापारीने बांधलं होतं ,त्या मंदिराजवळची ही तोफ. किंवा साटवली गढी सौरक्षणार्थ ही तोफ असावी.










एप्रिल १६७४ मुचकुंदीच्या खाडीत पूर्णगड किल्ल्या समोर आणि साटवली नावाच्या छोट्या कसब्याजवळ, सिद्दी संबूल आणि दौलतखान यांची दर्या गाजवणारी लढाई झाली. दोन्ही बाजूंनी पराक्रमाची शर्थ झाली. सिद्दी संबूल आणि दौलतखान जातीने आपल्या आरमाराचे नेतृत्व करत होते. एकमेकांवर बाणांचा वर्षाव करून दोन्ही आरमार हातात तलवारी घेऊन भिडले.
मराठ्यांची ४४ माणसे कामी आली. तर खुद्द दौलतखानाच्या पायाला बाण लागून तो जखमी झाला. पण सिद्दीचा दारूण पराभव झाला. सिद्दी कडील १०० माणसे मेली, तर सिद्दी संबूलच्याच गलबताला आग लागली. यात त्याचे दोन्ही हात भाजले.
संबूलने इथून जो पळ काढला तो थेट हरीहरेश्वरला पोहोचल्यावरचं थांबला. एकाप्रकारे दौलतखानाने महाराजांना राज्याभिषेकासाठी दिलेला नजराणाच हा. या लढाईमुळे मराठ्यांना राजापूर ते बारदेश हा पूर्ण तळकोंकण प्रांत, सिद्दीची चिंता न करता, जिंकता आला.
राज्याभिषेकाला त्रास देणे सोडाच, उलट सिद्दीने परत आलमगीरकडे कुमक पाठवण्याची केविलवाणी विनंती सुरु केली. आणि चक्क सप्टेंबर १६७५ पर्यंत, म्हणजे दीड वर्ष, कोणत्याही प्रकारे मराठ्यांच्या नादी लागला नाही.





लेखक व वर्णन :
अमित राणे यांच्या फेसबुकवरून माहितीसाठी साभार...

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

आडवाटेची भटकंती- किल्ले टकमक



दुर्गप्रेमी,हाडाचे डोंगरभटके,आणि सर्व गिरीमित्रांना माझा मानाचा मुजरा....

  वर्षाऋतु चालू झाला की आम्हां सह्याद्रीवेड्या जीवांना वेध लागतात ते पावसाळी भटकंतीचे...लवकरात लवकर जास्त पाऊस पडावा, आज पाऊस का नाही पडला??किंवा धबधबे,ओहळ चालू झाले असतील की नाही?? असे असंख्य प्रश्न आम्हां ट्रेकर्स जमातीला घरी बसून पडत असतात.मग फेसबुकवर कोण कुठे जाऊन आले आणि तेथील फोटो आवडले तर त्या मित्राला लाडीगोडी लावून तो वैतागेपर्यंत त्याला प्रश्न विचार किंवा मग मुंबई हाईकर्स वर जाऊन कॅलेंडर चेक कर त्यात एखादा ट्रेक आवडला तर आपल्या बजेटमध्ये बसतोय का ते पाहणे,गुगलबाबाला आळवत राहणे असे आमचे बिनकामाचे पावसाळी उद्योग चालू होतात.काही भटके तर पावसाळ्यात त्यांना आवडणाऱ्या गडांना भेट देतात.म्हणजेच काही भटक्यांना धो धो बरसणारा पाऊस राजधानी रायगडावर अनुभवायला आवडतो तर काहींना धबधब्यांनी भरून गेलेली राजमाची पाहायला आवडते.काहीजण धुक्यात गढून गेलेले भीमाशंकर अनुभवायला जातात तर काहीजण पावसाचा सामना करत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई गाठतात.गर्दीपासून जितके दूर जाता येईल तेवढे पळण्याचा आमचा विचार असतो कारण तिकडे दर्दी ट्रेकर्सची कमी असते.असे एकाहून एक वेडे आपल्या सह्याद्रीत दडलेले आहेत.असं वेड जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाही त्याचा अनुभव फक्त महाराष्ट्रातच येऊ शकतो.फक्त अशा डोंगरवेड्यांना हुडकून 'चल ना दादा मलापण
ट्रेकला घेऊन' असे म्हणण्याची कामगिरी आपली आहे.

   पावसाने वातावरण निर्मिती केलेली होती आणि पावसाळी भटकंतीचा श्रीगणेशा करायची वेळ जवळ येऊन ठेपली होती.शनिवार संपून रविवार उजाडत आला तरीसुद्धा अजून काही नक्की झाले न्हवते.घड्याळात दहा वाजून गेले पण अंथरून सोडायचे काही नाव नाही.दोन मित्रांच्या अंथरुणावरुन खाणाखुणा चालू होत्या.गुगलला राम राम करून टकमकवर सर्व गाडी येऊन ठेपली.

ठाणे जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सकवार गावच्या पाठीमागे असलेला पुरातन किल्ले टकमक भटक्यांची वाट पाहत दिमाखात उभा आहे.गर्द झाडी आपल्या अंगाखांद्यावर मिरवत व प्राचीन अवशेष उरात बाळगत,निसर्गाच्या जादुई दुनियेत घेऊन जाणारा किल्ले टकमक होय.

गडाचा इतिहास :
1) 12व्या शतकात राजा भिमदेव बिंब याने या गडाची निर्मिती केली.महिकावती राजधानीच्या शेजारी असलेल्या प्रांतात घाट माथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी या गडाचा प्रामुख्याने उपयोग केला गेला अ सावा.१४ व्या शतकात गुजरातच्या बहादुरशहाने हा गड जिंकून घेतला.१५ व्या शतकात मराठ्यांनी गड काबिज केला व त्यानंतर पोर्तुगीज यांनी या गडाचा ताबा घेतला.१७२०ते १७३७ वसई मोहीमे दरम्यान चिमाजी अप्पा यांच्या आग्रहाने पंताजी मोरेश्वरांनी हा गड काबिज केला. १८६० मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात हा गड गेला. गड उध्वस्त करून पुन्हा बसणार नाही याची खबर त्यांनी घेतली.त्यानंतर कैदखाना म्हणून या गडाचा वापर केला गेला.

   बाहेर पाऊस वेडावत होता पण एकदा मनाशी ठरले की माघार नाही हा आमचा नेहमीचा शिरस्ता कायम राखला गेला.सोबत भटकंतीचे साथीदार अजिंक्य आमटे होते.सर्व आवरून मालाड स्टेशन गाठेपर्यंत अकरा वाजले.आमचा प्रखर इरादा पाहून चक्क पावसाने माघार घेतली होती.गर्दीने भरलेली विरार गाडी पकडून एकदाचा निघालो.विरार स्टेशनपर्यत यायला बारा वाजले.विरार-वसई महानगर पालिकेच्या बस दर पंधरा  मिनिटाने शिरसाड येथे जाण्यासाठी निघतात.गर्दी असेल तर इथे गाडीसाठी रांग सुद्धा लागते.मार्केटमध्ये पोचतोय तोपर्यंत बस लागली होती.शेवटची सीट पदरात पडल्यामुळे जरा बरे वाटले.पुढे काय वाढून ठेवलेय याची जाणीव तेव्हा न्हवती पण मोकळा रस्ता पाहून जोशात आलेला ड्रायव्हर गतीरोधकावर सुद्धा ब्रेक न मारता गाडी हाकायला लागला तेव्हा मागची सीट म्हणजे किती सुख असते ते चांगलेच कळले.तुंगार फाटा इथे अर्ध्या तासात पोचलो.एव्हाना वातावरण बदलून आकाश निरभ्र झाले होते.नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत कमालीचा थंडावा जाणवत होता.फाट्यावर चहाची तलफ भागवून पाण्याच्या दोन बाटल्या बॅगेत कोंबल्या.ईथुन सकवारला जायला टमटम(दहा आसनी)गाडी मिळते हे ऐकून होतो पण टमटमचा काही पत्ता न्हवता.व घरून उशिरा निघाल्यामुळे इथपर्यन्त यायलाच बारा वाजून गेले होते.सकवार हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पश्चिम दुत्रगती महामार्गला जोडून असल्याचे माहीत होते त्यामुळे दिसेल त्या वाहनास हात दाखवायला सुरुवात केली.आमच्या नशिबाने एक मराठी टेम्पोवाल्या काकांनी गाडी थांबवली.अंगात मावळा हे टीशर्ट होते त्याचा परिणाम असावा बहुतेक..एकदाचे मार्गी लागलेलो बघून जरा हायसे वाटले.टेम्पोवाल्या काकांना त्यांची सगळी स्टोरी विचारून अगदी कसा धंदा करतात,प्रॉफिट किती आहे इथपर्यन्त प्रश्न विचारून झाले.काकासुद्धा तल्लीन होऊन आपली स्टोरी सांगायला लागले.शेवटी दोन बोलघेवड्या ट्रेकर्सची त्यांची गाठ पडली होती.

   एवढ्यात सकवार गावचा आणि गोशाळा विषयी माहिती असलेल्या बोर्ड रस्त्याच्या डाव्या बाजूला दिसू लागला.काकांना धन्यवाद देऊन निरोप दिला.घड्याळात दुपारचे एक वाजले होते.ब्रीजच्या उजव्या बाजूला सरळ सकवार गाव चालु होतो.धुक्यात  बुडालेल्या टकमकचे इथून मनोहर दर्शन होत होते.आम्हाला कुठे जाऊन परत यायचे आहे त्याची कल्पना आली आणि हे वेगाशिवाय शक्य न्हवते त्यामुळे वेग कमालीचा वाढवला.पाच मिनिटे चालल्यावर एक ओढा रस्त्यातच लागतो.रविवार असल्याने शाळेला जाणारी लहान मुले ओढ्यात मस्तपैकी डुंबत होती.काही मोठी माणसे मासे पकडताना दिसत होती.सकवार गाव हा कोकणात आल्याचा भास देतो.घरांच्या बाजूला पसरलेली हिरवीगार भातशेती,विहिरीवरून हंडाकळशी घेऊन पाणी भरणारी बायामाणसे,गुरे रानात चरायला घेऊन निघालेले गुराखी,खळखळून वाहणारा ओढा,पारावर गप्पा मारायला बसलेली मंडळी,धरणात डुंबणारी लहान मुले हि तिथली काही दृश्ये होती.आजचा दिवस आपण एका वेगळ्या जगात जगणार आहोत याची मनोमन खात्री पटली.डांबरी सडकेने सरळ निघालो गावातील काहीजण नवखे दिसतात व इतक्या दुपारी हे गड पाहून परत येतील का असे त्यांच्या कपाळावर प्रश्न पडले होते.गावात जेवणाची सोय न्हवती.गावात प्रवेश करताना ग्रामपंचायतीजवळ एक घर आहे टकमकला नंतर चार-पाच वेळा जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांना अगदी पटवून जेवण करायला सांगितले आणि व्यवसाय म्हणून याकडे लक्ष घाला असेही बजावले. कारण हा किल्ला पण लवकरच ट्रेकिंगच्या विश्वात प्रसिद्ध होणारा असाच आहे.

पहिलीच वेळ असल्याने गावकऱ्यांना रस्ता नीट विचारून घेतला.इथून पुढे दहा मिनिटे चालल्यावर सकवार गावचे ग्रामदैवतेचे मंदिर आहे.या मंदिराच्या डाव्या बाजूला खाली एक वाट सरळ जंगलात उतरली आहे.थोडे चालल्यावर एक घर लागते घराच्या उजव्या बाजूने गेलेल्या वाटेने सरळ खराखुरा ट्रेक चालू होतो.चालत चालत मोकळ्या माळरानावर पोचलो.सागाची असलेली दाट झाडी लक्ष वेधत होती.डाव्या बाजूला एक ओढा खळखळत होता.माळरानावर ढोरवाटा सगळीकडे पसरलेल्या,घनदाट होत जाणारे जंगल आणि मळलेली पायवाट सुद्धा नाही आता खरा कस लागणार होता.मग शेवटचा उपाय म्हणून किल्ला समोर ठेवून दिशा निश्चित केली आणि आडव्या वाटांची चाचपणी केली तर ओढा ओलांडल्यावर एक वाट वरच्या दिशेने सरकताना दिसली मग शेवटी त्या वाटेने निघालो.कधी मोकळे पठार तर कधी भाताची खाचरे तुडवत,गच्च भरलेल्या झाडीतून वाट शोधताना कसब पणाला लागले होते.

किल्ल्याच्या बाजूला गावकऱ्यांची शेती असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गावकरी येथे शेतात काम करताना हमखास दिसणार इथे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी आणि शेतराखणीसाठी त्यांनी झोपड्यासुद्धा बांधल्या आहेत.पावसाळा चालू असल्याने गावकरी शेतात काम करताना दिसत होते.एक भाऊंनी तर बैल नांगराला जुंपून ठेवले होते फक्त बैलांना आवाज द्यायचा अवकाश..मस्तपैकी पानांची चंची सोडून बांधावर पानसुपारी तोंडात कोंबून भाऊंनी नांगराला हात लावला बैल काही बोलायच्या अगोदरच फेरे घ्यायला लागले तेव्हा आमची गावची सागर-राजाची बैलजोडी आठवली काठीशिवाय नांगर अचूक चालणारी पण वडिलांशिवाय कोणाला हात लावू न देणारी मी कधी नांगर धरायचा प्रयत्न केलाच तर तर त्यांना बरोबर कळायच की पाठीमागचा नवखा आहे मग काय सरळ बांधाच्या बाहेर वरात निघायची.अशा अनेक आठवणी उलगडू लागल्या. वेळ झाल्यामुळे भाऊंचा  निरोप घेतला वाट माहिती करून पुन्हा टकमककडे वळलो.भाताची खाचरे आणि मोकळी पायवाट संपल्यावर परत एक छोटा ओहळ लागतो.पाण्यात मस्तपैकी बुचकळून ताजातवाना झालो.थकवा कुठच्याकुठे पळून गेला होता.
   या कातळाच्या बाजूने डाव्या हाताला एक वाट सरळ गडाच्या दिशेने वर गेली.पक्की खातरजमा करून निघालो.पाऊस पडल्यामुळे वाटेवर चिखल होऊन वाटा घसरट झाल्या होत्या.दगड येऊन वाटेवर पसरले होते.अनोळखी वाटेवरून आम्ही दोघेजण घनदाट जंगलातुन चाललो होतो.किल्ल्यावर आजच्या दिवसात कोणीही गेले न्हवते असे ती वाटच बोलत होती.

दोनचार कातळटप्पे पार केल्यावर ऐन गडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोचलो होतो.आता चढाई सरळसोट दम काढणारी होती.डोंगराच्या धारेवरून चालत पठारावर पोहोचलो.पुढे घोड्यासारख्या दिसणाऱ्या जागेला वळसा घालून पश्चिमेकडील तटबंदी वरून आपला टकमक गडावर प्रवेश होतो.  इथे कातळकोरीव पायऱ्या आहेत.सुरुवातीला पाण्याचे 2 टाक व पुढे गेल्यावर ३ टाक्यांचे २ समुह आहेत अशी एकूण 12 टाकी गडावर आढळतात.तसेच उजवीकडे 2 बांगडी तोफा आहेत.समोरच्या  डोंगरावर टेहळणीची जागा दिसते.पुढे पठाराच्या उत्तर टोकावरील कातळात २ फूट व्यासाचे व २ फूट खोल २ खड्डे कोरलेले पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी या टोकावर बसून टेहळणी करणार्‍या टेहळ्यांना पाणी पिण्यासाठी जागा सोडून जावे लागू नये म्हणून हि योजना करण्यात आली होती. हे खड्डे ठराविक वेळाने जवळाच्या पाण्याच्या टाक्यातून पखालींनी पाणी आणून भरले जात असत. टकमक गडावरून  दक्षिणेला कामण गडाची डोंगररांग दिसते. पश्चिमेला समुद्राला मिळणारी वैतरणा नदी दिसते तर पूर्वेला वांदरी तलाव छान दृष्टीक्षेपात येतो.

वर्षा ऋतूमधील जुलै,ऑगस्ट तसेच गुलाबी थंडीचे नोव्हेंबर,डिसेंबर या ठिकाणाला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी असेल.या दिवसात हा गड हिरव्यागर्द वनराईने नटलेला असतो.निसर्गसौंदर्याची चौफेर उधळण झालेले असे हे ठिकाण आहे.मुंबईतील विरारमध्ये सकवार गावच्या पाठीमागे हे असे काहीतरी अद्भुत दडलेले आहे यावर प्रथमदर्शनी विश्वासच बसत नाही परंतु एका फेरीत हा किल्ला आपल्या आवडत्या सूचित हमखास जोडला जातो याची माझ्याकडे खात्री आहे.किल्ला पाहण्यासाठी जाताना गावातील स्थानिक वाटाड्या घेणे क्रमप्राप्त आहे नाहीतर दिवसभर जंगलाच्या चक्कर मारून चुकण्याचा धोका जास्त आहे.

असे सुंदर गडदर्शन झाल्यावर घरून आणलेला डबा काढून आम्ही जेवायला बसलो.जेवण उरकेपर्यंत 4 वाजले होते आता वेळ आली होती निरोपाची तसेच न थांबता गड उतरायला घेतला.जंगलातील रानफुले व पक्षांचे आवाज अनुभवत ओढ्यामध्ये बुचकाळत एकदाचा गावात पोचलो घरी जायला मन अजून तयार न्हवते.कसातरी पाय ओढत मुख्य हायवेवर आलो तर टमटम वाले दादा आमची वाट पाहतच होते मग टमटम ने फाट्यापर्यंत व नंतर मिडी बसने विरार स्टेशन असा प्रवास करत या अनोख्या आठवणीत राहणाऱ्या निसर्गसफरीची समाप्ती केली ते पुन्हा इथे येण्यासाठीच....


किरण प्रकाश भालेकर
Bhalekar117.Blogspot.com




























शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभीवादन..

विश्वरत्न ,युगप्रवर्तक ,प्रज्ञासूर्य ,क्रांतिसुर्य, ज्ञानाचा अथांग सागर बोधिसत्व  डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीदिनी  त्यांना विनम्र अभिवादन .

ग्रंथ हेच गुरू..
शिका संघटित व्हा संघर्ष करा हे संदेश बाबासाहेबांनी आपल्याला दिले त्यांना फक्त एकाच जातीत कोंडण्याचे कटकारस्थान काही करंटे करत असतील तर निव्वळ मूर्खपणा आहे.या महापुरुषांनी जातीपातीला समाजकार्यात स्थान दिले नाही मग आपण त्यांच्यात भेदभाव करणारे कोण..?राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले तसेच समाजातील गांजलेल्या गरीब जनतेसाठी त्यांनी संविधानात महत्वपूर्ण तरतुदी करून या बहुजन वर्गाला समाजात सर्वांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे बळ दिले.देशातील किंबहुना जगातील उच्चविद्याविभूषित म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात.यांच्या पदवीची लिस्ट वाचली तरी सामान्य माणूस चक्कर येऊन पडेल.☺ असा हा युगपुरुष आपल्या देशात होऊन गेला याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे.

आज त्यांची जयंती डीजेच्या तालावर,लाईटच्या झगमगाटात शक्तीप्रदर्शन करून साजरी केली जाते ते बघून वाईट वाटते.आज आपण सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या याच पद्धतीने साजऱ्या करतोय,करू देतोय.या महान माणसांनी दिलेला वैचारिक वारसा तसाच मागे पडत चालला आहे.यासाठी जास्त काही करायची गरज नाही येणाऱ्या भावी पिढीच्या,लहानग्यांच्या मनामध्ये या महान माणसांनी केलेले कार्य,विचार ठसवले तरी आज आपण जे जातीपातीत मरतोय ते कमी होईल.एक सुदृढ समाज निर्माण होऊन देशाच्या प्रगतीला नक्कीच हातभार लागेल.नाहीतर मग कलाम सरांनी बघितलेले स्वप्न भारत महासत्ता बनेल ते फक्त स्वप्नच राहील..

किरण भालेकर
Bhalekar117.blogspot.com

गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

Kalsubai-Everest Of Maharashtra(23,24 Jun 2018)

Hey...,
Trekkers & Nature Lovers ..

Safar Sahyadri Trekkers organise a trek to Kalsubai_Highest Peak of Maharashtra on 23,24 Jun 2018.

About Kalsubai :
Kalsubai is the highest peak of the Sahyadris, the Everest of Maharashtra. At the summit is a small temple of Kalsubai. This being the highest peak, it commands a beautiful view.To the north of the mountain range forts such as Ramsej, Harihargad, Brahmagiri, Anjaneri, Ghargad, Bahula, Tringalwadi, Kavnai can be seen. To the east one can spot Aundha, Vishramgad, Bitangad, to the west Alang, Madangad, Kulang, Ratangad (south west) and to the south Pabhargad, Ghanchakkar, Harishchandragad can be seen.
Kalsubai is very famous trekking and tourist destination and one can witness entire Bhandardara region from its top. It’s a benchmark climb for many trekkers being the highest point in Shayadris.

●Meeting point● : Dadar station Big bridge(central, western) Tikit counter.                         
Date :23 Jun (Saturday) 2018                                                   Timing : 8.40Pm
Total Trek Cost - 800/

Charges include● :
Kasara To Bari village Tamtam,Pickup Fair Return.Night Stay charges.
Morning Tea,breakfast,1 Lunch(vej,nonvej)Evening
Tea, Breakfast..
Expert guidance,First Aid kit for the Trek.
Travel by public transport St bus,tamtam,Train.

● Charges Exclude● :
Night Dinner,Train Tikit, personal exp,
Anything Not mention in INCLUDES.

Things To Carry ● 
All items bellow are compulsory..
1)Carry Your Lunch For Saturday Night.
2)carry your Train Tikit for Kasara Return.
3)Good haversack bag to put in all the things to be carried.Wear Full Trakpant,Tshirt or Full Shirt.
4)A bottle of water (2 ltr)
5)camera(optional), Avoid wearing Gold and other jewelry(at own risk)
6) Rainkot,Jacket,Eletrol powder 2 lemon,some snack,biskit.
7) Personal medicine & plastic bag,odomas or same brand.
8) A good Treking shoes ,towel and extra clothes .
9) Any one original photo ID proof

Please Transfer Your Trek Fees Bellow Account Details .

● Bank Account Details ●
Union Bank
Name : KIRAN PRAKASH BHALEKAR
Account No : 384402120002262
IFSC code : UBIN0538442
Branch :Malad (E)

●Trek schedule ● :
Time Line : It may change due to some unavoidable condition.
8.40Pm Reporting at Dadar station.
Catch 9.06Pm Lokal Pf.No.4  Kasara Side Second Coach,(Cst-Kasara)
9.13Pm kurla,9.33Thane,9.45dombivali ,9.54kalyan,10.08Titwala,10.28asangaon,
11.05 Pm rich Asangaon station.
11.30 To 12.30 pm Rich base Village by (pickup,tamtam)
1.00Am To 4.30Am Rest & sleep Timing
4.30Am wake up call
5.00 am To 5.30 Am Tea & Nashta Time.
5.30 Am start Trek To Kalsubai
9.00 Am rich The Top of Kalsubai Peak.
9.00 Am To 11.00 Am Explorer The Kalsubai,Rest,Photography...
11.30 Am start Descending To Kalsubai
11.30Am To 1.30 Pm Rich village Home.
2.00 PM To 3.30 pm Lunch & Rest ...
4.00 To 5.00 pm Bari To Asangaon station by pickup,Tamtam
5.00 To 7.30 Pm Asangaon To Dadar Station by Train.

● IMP NOTE ●  : Maximum Participants 26 Only.
Please Give Your Confirmation Befor 20 Jun 2018.
STRICTLY NOT ALLOWED ANY KIND OF TOBACCO,ALCOHOL, DRUGS.

Do feel free to contact any of us for any queries/clarification.
We recommend you to please take care while walking / climbing / Rafting / Trekking. Wearing of any valuables, ornaments, jewelry etc. is prohibited. Mo Rock Climbing, Rappelling, Trekking or any adventure activity is potentially risky. For all these events, you are at your own risk. Organizers are not responsible for any accident or compensation in whatsoever manner. We should strictly follow the code of conduct.

Regards :
Safar Sahyadri Trekkers
Facebook.com/safarsahyadri
safarsahyadri@yahoo.com

(Team Leader )
Kiran bhalekar -    9619333915
Tushar shingare - 8976225394
Amar Gorule -       8779417367

Event Link :https://www.facebook.com/events/1683825608322077/?ti=cl

Whatsapp Group Link : https://chat.whatsapp.com/7N06ac7SwVV1WIr8jk4P77

सोमवार, १२ मार्च, २०१८

Mahuli Fort Trek(31March,1April)

Dear Trekkers And Hikers,
Safar Sahyadri Trekkers organise a trek to fort Mahuli,Asangaon on  31,1(April)  2018 .
●Description● : 
Mahuli Fort At 2815 ft., this is a popular trekking destination and a paradise for rock-climbers because of many nearby pinnacles with interesting names like Vazir, Vishnu, etc., given by the local trekking and climbing fraternity. This mountain complex is actually a group of two or more hills with common cols and pinnacles.
It is the highest point in the Thane district. The forest surrounding Mahuli has been declared as a sanctuary. Once Shahaji Raje, father of Chatrapati Shivaji Maharaj, had this fortress under his belt. The fort has been declared as a protected monument.
Besides an open Shiva temple there is a small perennial drinking water cistern on top, three caves of which the larger can be used as overnight shelter, like as on many other such natural hill forts of Maharashtra Western Ghats (Sahyadri Range). There is a stone arch historically known as the 'Kalyan Darwaja' but the dome of the arch is now broken.

●Things To Carry ●  :
All items bellow are compulsory..
1)Carry Your Lunch For Saturday Night.
2)carry your Return Train Tikit for Aasangaon.
3)Good haversack bag to put in all the things to be carried.Wear Full Trakpant,Tshirt or Full Shirt.
4)A bottle of water (2 ltr)
5)camera(optional), Avoid wearing Gold and other jewelry(at own risk)
6)Eletrol powder ,2 lemon,some snack,biskit.
7) Personal medicine & plastic bag,odomas or     same brand.
8) A good Treking shoes ,towel and extra clothes .
9) Any one original photo ID proof

●Meeting point● : Dadar station Big bridge(central, western) Tikit counter.                         
Date :31March (Saturday) 2018                             Timing : 8.40Pm
Total Trek Cost - 600/

●Charges include● :
Asangaon To Mahuli village bus or Tamtam,Pickup Fair Return.
Morning Tea,breakfast,1 Lunch(vej,nonvej)Evening
Tea, Breakfast..
Expert guidance,First Aid kit for the Trek.
Travel by public transport St bus,tamtam,Train.

● Charges Exclude● :
Evening Lunch,Train Tikit, personal exp,
Anything Not mention in INCLUDES.

●IMP Note● : Please give your confirmtion before  28 March 2018. Trek Leader Reserves the Right To Change The Format Of The Event.

● Bank Account Details ●
Union Bank
Name : KIRAN PRAKASH BHALEKAR
Account No : 384402120002262
IFSC code : UBIN0538442
Branch :Malad (E)
●Trek schedule ● :
Time Line : It may change due to some unavoidable condition.
8.40Pm Reporting at Dadar station.
Catch 9.06Pm Lokal Pf.No.4  Kasara Side Second Coach,(Cst-Kasara)
9.13Pmkurla,9.33Thane,9.45dombivali ,9.54kalyan,10.08Titwala,10.28asangaon .
10.30 Pm rich Asangaon station.
10.50 To 11.40pm Rich base Village by (pickup,tamtam)
12.00Pm To 1.00Am campfire.
1.00 To 6.00Am sleep Timing.
7.40Am To 8.20Am tea & breakfast.
6.00Am wakeup call
6.00 To 6.30Am Tea& Nashta.
6.30 Am start Trek To Mahuli Fort.
9.30 Am rich The Top of Fort
10 Am To 12.00 pm Explorer The Fort,Rest,Photography...
12.00 pm start Descending To Mahuli Fort.
12.00Pm To 1.30 Pm Rich village Home.
2.00 PM To 4.00 pm Lunch & Rest ...
4.00 To 4.30 pm Mahuli To Asangaon station by pickup,Tamtam,bus.
5.00 To 7.00 Pm Asangaon To Dadar Station by Train.
Do feel free to contact any of us for any queries/clarification.
We recommend you to please take care while walking / climbing / Rafting / Trekking. Wearing of any valuables, ornaments, jewelry etc. is prohibited. Mo Rock Climbing, Rappelling, Trekking or any adventure activity is potentially risky. For all these events, you are at your own risk. Organizers are not responsible for any accident or compensation in whatsoever manner. We should strictly follow the code of conduct, to avoid troubling our fellow freinds or other people from our group or outside.
Regards :
Safar Sahyadri Trekkers
Facebook.com/safarsahyadri
safarsahyadri@yahoo.com
(Team Leader )
Kiran bhalekar -    9619333915
Tushar shingare - 8976225394
Amar Gorule -       8779417367

शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

बाळासाहेबांचे शिवसैनिक...



संपादन करा

महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव….....शिवसेना.........यानंतर बाळासाहेबांनी जून १९इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावाऑक्टोबर ३०इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाही.

झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरेमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, Bombayचे Mumbai असे स्पेलिंग... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या तथाकथित संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात (सत्ताकारणात) जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरक होय.
जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था - साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशीसुधीर जोशी, कै. प्रमोद नवलकर, कै. मधुकर सरपोतदारछगन भुजबळसुरेश प्रभु, कै.आनंद दिघेदत्ताजी नलावडे,.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.
अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूकप्रचारपदपैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते.

साभार - विकिपीडिया


हिंदुहृदयसम्राट



साहेबांचा स्मृतीदिन...


     दसरा मेळावा 2016 शिवतीर्थ

   

  दसरा मेळावा 2017 शिवतीर्थ