शुक्रवार, २१ जुलै, २०१७

महाराष्ट्राची हेरगिरी...

शिवाजी राजे आणि बहिर्जी नाईक यांच्या विचारावर उभी आहे इस्राईल गुप्तहेर संघटना 'मोसाद

*"महाराष्ट्राची हेरगिरी..!!!"*

जगातील दुस-या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय म्हणजे 'हेरगिरी'
जवळपास सर्वच देशांकडे आज त्यांच्या गुप्तचर संघटना अथवा संस्था आहेत आणि त्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात.

गुप्तचर अथवा हेर हे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आर्य चाणक्यांच्या 'अर्थशास्त्र' मध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो. याबाबत विस्तृत विवेचन चाणक्यांनी करून ठेवलेले आहे.
*छत्रपती शिवाजी महाराजांचा 'गनिमी कावा' यशस्वी होण्यामागे 'बहिर्जी नाईक' यांच्यासारख्या हुशार-चलाख हेरांचा सहभाग मोठा आहे.*

अमेरिका, रशिया आणि इस्राईल या देशांच्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तचर संस्थांचा जगभरात विशेष दबदबा आहे.

'बाजीराव जाधव' महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे, वयाच्या सोळाव्या वर्षीच भारतीय सैन्यदलात नोकरी स्वीकारून देशसेवेचे अखंड व्रत अव्याहतपणे जपणारे. सन १९९९ च्या कारगिलच्या लढाईत आपल्या सार्थ पराक्रमामुळे भारत सरकारने त्यांना 'शौर्य पदक' देऊन वरिष्ठ पदावर नेमणूक केलेली.
चौकस बुद्धी, विशेष धाडस, शौर्य यांच्या जीवावर बाजीराव हिंदुस्थानी गुप्तहेर खाते "रॉ" (RAW) मध्ये रुजू झाले.

"रॉ" : RAW-Reasearch & Analysis Wing, हिंदुस्थानी गुप्तहेर संघटना, ज्याची स्थापना, सन १९६२ (भारत-चीन) आणि सन १९६५ (भारत-पाकिस्थान) च्या युद्धा नंतर सैन्याची कामगिरी आणखी प्रबळ करण्याकरिता 'श्री. रामेश्वरनाथ काव' यांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर, १९६८ मध्ये करण्यात आली. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळ-जवळ २० वर्षांनंतर..!

अमेरिकेत.., 'जागतिक सुरक्षा परिषद' संपवून बाजीराव गाडीमधून विमानतळाकडे रवाना होत असताना, एका सुंदर परदेशी मुलीने त्यांना थांबविले.
तिला समोर पहाताच बाजीराव आनंदित झाले...,
बाजीरावांनी स्मित वदनाने त्यांना अभिवादन केले.

'नमस्ते..!

.....*जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर खात्याची उच्च अधिकारी 'साराह' बाजीरावांसमोर मोठया प्रसन्न चेह-याने दोन्ही हात जोडून उभी होती...!*

बाजीरावांचा तो भारतीय स्नेह स्वीकारत ती उत्तरली..

'नमस्ते..!!
'अरे, मी इथे गुप्तहेर म्हणून नव्हे तर माझ्या देशाची प्रतिनिधी म्हणून आले आहे. तुला पाहिले आणि राहवले नाही.. आणि तुला भेटायला आले.'

साराह आणि बाजीराव हे काही वर्षांपूर्वी इस्राईल येथे भेटले होते.

*साराह ही इस्राईल गुप्तहेर संघटना 'मोसाद' ची एक तरुण, तडफदार आणि तितकीच निडर अधिकारी आहे.*

*'मोसाद'... एक अशी गुप्तहेर संघटना, जिच्या हिटलिस्टवर जर एखाद्याचे नाव चढले तर प्रत्यक्ष देवसुद्धा त्याला वाचवू शकत नाही, असा दरारा...!!*

इस्राईल सारख्या तुटपुंज्या देशाची ही छोटीशी संघटना असामान्य कर्तृत्व, जगातील सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट गुप्तहेर संघटना कोणती, तर डोळे झाकून उत्तर येते 'मोसाद'.

'मोसाद' चा अर्थ साक्षात मृत्यू...! आपल्या देशाच्या शत्रूला शोधून, त्याला आपल्या देशात गुप्तपणे आणून त्याला शिक्षा देते. शिक्षा दिल्यानंतर सर्व जगाला कळते, की अमुक-अमुक व्यक्तीला शिक्षा दिली गेली. इतकी खतरनाक संघटना.

मोसादचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 'कमालीची गुप्तता', याच गुप्ततेमुळे मोसादमध्ये दुस-या कुठल्याही गुप्तचर संघटनेला आपला हेर घुसवणं जमलेलं नाही, पण याच मोसादनं जगातील सर्वच गुप्तचर संघटनेमध्ये आपले हस्तक घुसवलेले आहेत. त्यामागचा हेतू एकच-माहिती मिळवणं.

*अशा गुप्तहेर संघटनेत दहा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी बाजीराव इस्राईलला गेले होते, तेंव्हा सारहाची भेट झाली होती. तिच्याकडून खूप काही शिकून घेतले होते.*

आज इतक्या वर्षांनंतर सारहाने बाजीरावांना ओळखले.
विमानाला अजून २/३ तास अवकाश होता म्हणून दोघेही कॉफीशॉप मध्ये बोलत बसले.

'सारहा, तू इतक्या वर्षांनंतरही मला अचूक कसे काय ओळखलेस..?'
मला वाटले, ज्यांना सारे जग घाबरते अशा संघटनेची एक वरिष्ठ अधिकारी स्वतःच्याच अभिमानात(तो-यात) असेल; पण तू तर मला अजूनही लक्षात ठेवलेस..! It's really surprising...!!

किंचित स्मित हास्य करीत सारहा म्हणाली,

'अरे, असे नको बोलूस.., *आम्ही जगात सर्वांना विसरू, पण भारतीय लोकांना कधीच नाही.*

एक परदेशी मुलगी, आणि ती ही एका महाभयंकर अशा गुप्तहेर खात्याची अधिकारी...!! आपल्या भारताबद्दल तिच्या प्रति असलेले प्रेम-आस्था पाहून डोळे भरून आले.

सारहा पुढे बोलत होती;
'अरे, हे काहीच नाही. जरी आम्ही जगात सर्व श्रेष्ठ असलो तरी आमच्या गुप्तहेर खात्याचा आत्मा-शिकवण ही मूळची भारताचीच आहे, *आम्हाला तुमचा इतिहास, तुझ्या महाराष्ट्राचा इतिहास अगदी कोळून शिकवला जातो.

*आम्हाला शिवाजी राजे शिकवले जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या गुप्तहेर प्रणालीचा आत्मा आहे... बहिर्जी नाईक...!*

'बहिर्जी नाईक', नाव ऐकताच बाजीरावांच्या डोक्यात झिणझिण्या आल्या, अंगावरून सरसरून काटा आला.... डोळ्यांत अश्रू आपसूक तरळले.

बाजींकडे पहात सारहा म्हणाली,

'तुझ्या डोळ्यांत पाणी..? माझं काही चुकलं का...?'

नकारार्थी मान हलवत बाजीरावांनी डोळे पुसले आणि बोलू लागले,

*'नाही सारहा, तू ज्यांचे नाव घेतलेस त्या बहिर्जी नाईकांना, त्यांच्याच महाराष्ट्रात लहानाचा मोठा झालो तरी समजू शकलो नाही, मीच नाही माझ्या सारखे कित्येक आहेत ज्यांना बहिर्जी नाईक सोड पण आमचे राजे 'छत्रपती शिवाजी महाराजही' नीटसे माहिती नाहीत.*
आज त्यांचे नाव तुझ्या सारख्या विद्वान-निडर मुलीच्या तोंडून ऐकून मी पुरता खजील झालो आहे.

बाजीरावांचे ते बोलणे ऐकताच सारहा म्हणाली;
'अरे, तुम्ही खूप भाग्यवान आहात, आमची काम करण्याची पद्धत तुमच्या शिवाजी राजांसारखी अन् बहिर्जी नाईकांसारखीच आहे. आमच्या हर एक अधिका-यांच्या तोंडी तुमच्या शिवाजी राजांचा आणि बहिर्जी नाईकांचा सर्व इतिहास तोंडपाठ आहे, आणि तो आम्हाला ठेवावाच लागतो, तसेच आम्हाला शिकवले जाते. आमची training च तशी आहे.

सारहा बोलत होती आणि बाजीराव ऐकत होते.

बाजीराव सारहाचा निरोप घेऊन विमानात बसले, प्रवासात.., डोक्यात फक्त अन् फक्त एकच विचार..,शिवाजी राजे आणि बहिर्जी नाईक.

'किती मूर्ख आहोत आपण भारतीय, सा-या जगाला घाबरून सोडणारी 'मोसाद' ही मराठयांचा दैदीप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्ताचे मराठे आज तुटपुंज्या देशाचा दहशतवाद गेली पन्नास वर्षे निमूटपणे सहन करतोय, आजही आमचे जवान हकनाक बळी जातायेत. बाजीरावांच्या डोक्यात विचारांचा डोंब उसळला होता.
आता त्यांना एकच ध्यास लागला होता शिवाजी राजांचा - या महाराष्ट्राचा बहिर्जी नाईक समजून घेण्याचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा