रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

मराठा क्रांती मोर्चा


9 ऑगस्ट 2017 हा दिवस मुंबईच्या इतिहासातील सुवर्णअक्षरांत नोंदविला गेला.महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातुन आलेल्या मराठा बांधवांनी मुंबईत आपल्या उपस्थितीने गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले.नेहमी वेळेत धावणारी मुंबई या दिवशी ठप्प झाली आणि त्याचे मुख्य कारण होते हा मराठा मोर्चा... लाखोंच्या संख्येने 57 मोर्चे काढल्यानंतरही सरकारला जाग येत न्हवती म्हणून हा निर्णायक मोर्चा मुंबईत जिजामाता उद्यान भायखळा ते आझाद मैदान इथे 5 किमीच्या अंतरात काढण्यात आला.तब्बल 20 हजार पोलीस मोर्चासाठी हजर होते. या मोर्चाची खुद्द जगालाही आपल्या वर्तमानपत्रात दखल घ्यावी लागली आहे.सोबतच्या प्रतिमांतून आपल्याला याची कल्पना येईल.                           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा